शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जमावाच्या मारहाणीत दोन अतिरेकी ठार, पाच मजुरांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 05:52 IST

आसाममधील तीनसुकिया जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी पाच बंगाली मजुरांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर या राज्याच्या कचर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी संतप्त जमावाने केलेल्या जबर मारहाणीत दोन दहशतवादी ठार झाले.

सिलचर : आसाममधील तीनसुकिया जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी पाच बंगाली मजुरांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर या राज्याच्या कचर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी संतप्त जमावाने केलेल्या जबर मारहाणीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून काही शस्त्रे व दारूगोळा पोलिसांनी जप्त केला.हरीनगर येथील बसस्टॉपवर संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत हे दोेघे संशयित दहशतवादी गंभीर जखमी झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सिलचर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोघांकडून तीन एके-५६ रायफली, चिनी बनावटीची एलएमजी बंदूक, एक रायफल असा शस्त्रसाठा व दारूगोळा जप्त करण्यात आला. ठार झालेले दहशतवादी दिमा हसाओ जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.तीनसुकिया येथे दहशतवाद्यांनी ठार केलेल्यांच्या कुटुंबियांची तृणमूल काँग्रेसच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने रविवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या हल्ल्यामागील गुन्हेगारांना शोधून त्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणीही या पक्षाने केली.ठार झालेल्यांच्या कुटुंबांतील वारसदारांना प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत या पक्षाने दिली आहे. या शिष्टमंडळात पक्षाचे नेते डेरेक ओब्रियन, लोकसभा खासदार ममता बाला ठाकूर, राज्यसभा खासदार नदिमूल हक व आमदार महुआ मोईत्रा यांचा समावेश होता.या हत्याकांडाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही तीव्र निषेध केला होता. नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) प्रकाशित करण्यासाठी हालचाली सुरू असताना सिलचर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्याकरिता तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदारांचे शिष्टमंडळ २ आॅगस्ट रोजी तिथे गेले होते; पण त्यांना विमानतळावरच अडविण्यात येऊन दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांना परत पाठवून दिले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Assamआसाम