शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

आमदारकी हा व्यवसाय नव्हे !

By admin | Published: February 13, 2016 8:15 PM

विधिमंडळाचा सदस्य असणो म्हणजेच आमदारकी हा कोणाचाही उपजीविकेचा व्यवसाय मानता येऊ शकत नाही. त्यामुळे सभागृहात गोंधळ घातला म्हणून विधिमंडळाने एखाद्या आमदारास

- अजित गोगटे
 
सुप्रीम कोर्ट: सभागृहात बोलणो अभिव्यक्ती स्वातंत्र्यात नाही.
 
मुंबई: विधिमंडळाचा सदस्य असणो म्हणजेच आमदारकी हा कोणाचाही उपजीविकेचा व्यवसाय मानता येऊ शकत नाही. त्यामुळे सभागृहात गोंधळ घातला म्हणून विधिमंडळाने एखाद्या आमदारास निलंबित केले तरी त्यामुळे त्या आमदाराच्या राज्यघटनेने दिलेल्या पसंतीचा व्यवसाय करण्याच्या मुलभूत हक्कावर कोणतीही गदा येत नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
तसेच  राज्यघटनेने आमदाराला सभागृहात बोलण्याचे स्वातंत्र्य दिले असले आणि त्यासंदर्भात संरक्षणही दिले असले तरी सभागृहात बोलण्याचे हे स्वातंत्र्य त्या आमदारास एक भारतीय नागरिक म्हणून असलेल्या व्यापक अभिव्यक्ती स्वातंत्र्याहून पूर्णपणो वेगळे आहे. त्यामुळे सभागृहात केलेल्या कृत्यामुळे आमदाराला निलंबित केले जाणो हे त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणोही ठरत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
एवढेच नव्हे तर संबंधित आमदारास निलंबनाच्या काळासाठी पगार व भत्ते न देण्याचा ठराव सभागृहाने केला तरी त्यामुळे त्या आमदाराचा जगण्याचा मुलभूत हक्कही बाधित होत नाही, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला.
तमिळनाडू विधानसभेतील अलगाप्पुरम आर. मोहनराव यांच्यासह डीएमडीके पक्षाच्या सहा आमदारांनी केलेल्या रिट याचिकेवर न्या. जे. चेलमेश्वर आणि न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निकाल दिला. न्यायालयाने या आमदारांनी मांडलेले अन्य सर्व मुद्दे फेटाळले. मात्र सभागृहाच्या  हक्कभंग समितीने नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन न केल्याने समानतेच्या हक्काचा (अनुच्छेद 14) भंग झाला हा त्यांचा मुद्दा मान्य करून हक्कभंग समितीने त्यांना दिलेली शिक्षा न्यायालयाने रद्द केली. समितीने केलेली शिफारस मान्य करून विधानसभेने या आमदारांना पुढील अधिवेशनाच्या काळातही 10 दिवसांसाठी निलंबित केले होते व या निलंबन काळाचा त्यांचा पगार व भत्तेही न देण्याचे ठरविले होते.
गेल्या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी या पक्षाच्या एकूण नऊ आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला होता. सुरुवातीस अध्यक्षांनी थांबायला सांगूनही या पक्षाचे गटनेते बोलतच राहिले म्हणून अध्यक्षांनी मार्शलना बोलावून त्यांना सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर त्या पक्षाचे बाकीचे आठ आमदार अध्यक्षांच्या दिशेने धावून गेले व त्यांनी त्यांना धक्काबुक्की करून आसनावरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांनी हे प्रकरण हक्कभंग समितीकडे धाडले. समितीने अध्यक्षांवर धावून जाण्याच्या बाबतीत नऊपैकी सहा आमदारांना दोषी धरले व त्यांना वरीलप्रमाणो शिक्षा ठोठावली होती.
मुळात सभागृहातील कामकाजाच्या संदर्भात न्यायालयात दाद मागताच येत नाही, असा प्राथमिक आक्षेप विधिमंडळ सचिवालयाने घेतला होता. परंतु तो अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की,विधिमंडळास स्वत:च्या कामकाजाचे नियम करण्याचे आणि त्यानुसार कामकाजाचे नियमन करण्याचा अध्यक्षांना अधिकार असला तरी हे अधिकार वापरताना नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उल्लंघन झाले असेल तर तेवढय़ा बाबतीत न्यालय हस्तक्षेप करू शकते.
 
न्यायालयाचे ढळक निष्कर्ष...
- राज्यघटनेच्या अनुच्छेद 194 अन्वये आमदारास सभागृहात मक्तपणो बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण हे स्वातंत्र्य फक्त आमदार असेर्पयत व आमदार म्हणूनच मर्यादित आहे.
- राज्यघटनेच्या अनुच्छेद 19(1)(ए) अन्वये असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकास उपलब्ध आहे व ते आमदारांच्या सभागृहात बोलण्याच्या स्वातंत्र्याहून वेगळे आहे. त्यामुळे सभागृहात बोलू न देण्याने त्या आमदाराच्या नागरिक म्हणून असलेल्या मुलभूत हक्कास बाधा येत नाही.
- अनुच्छेद 19(1)(जी) अन्वये प्रत्येक नागरिकास त्याच्या पसंतीचा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण यात अभिप्रेत असलेला व्यवसाय हा चरितार्थ चालविण्यासाठी चालविण्यासाठी केला जाणारा कामधंदा असा आहे. आमदारकी ही आयुष्यभरासाठी स्थायी स्वरूपाची नसल्याने तो ‘व्यवसाय’ होत नाही.
- काही दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केले जाण्याचे आमदाराच्या व्यवसाय स्वातंत्र्यावर घाला येत नाही. कारण मुळात आमदारकी हा व्यवसायच नाही.