शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

महिलांवर अत्याचार होणं आणि सरकारने गप्प बसणं ही देशासाठी भीषण शोकांतिका आहे - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 16:24 IST

मणिपूरमधील हिंसाचार आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांनी देशभर संतापाची लाट उसळली आहे.

manipur violence news : मणिपूरमधील हिंसाचार आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांनी देशभर संतापाची लाट उसळली आहे. विवस्त्र अवस्थेत महिलांची धिंड काढून काही नराधमांनी राज्यात दहशत पसरवली आहे. मागील दोन महिन्यांपासून ईशान्येकडील हे राज्य हिंसाचाराच्या आगीत जळते आहे. महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून दहशत माजवणाऱ्या नराधमांना मणिपूर पोलिसांनी अटक केली असली तरी देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मणिपूरच्या घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.

मणिपूरमध्ये स्वातंत्र्यसैनिकाच्या ८० वर्षीय पत्नीला जिवंत जाळण्यात आले. कारगिल युद्धात आपल्या देशासाठी लढलेल्या सैनिकाच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि कपड्यांशिवाय धिंड काढण्यात आली. इतरांना देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटणारे आता कुठे आहेत?, असा प्रश्न ठाकरेंनी केला. तसेच स्वातंत्र्यसैनिक किंवा सैनिकांचे टॅग नसला तरीही महिलांवर असे अत्याचार होणं आणि सरकारने गप्प बसणं ही देशासाठी शरमेची गोष्ट आणि भीषण शोकांतिका आहे. म्हणूनच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची ताबडतोब हकालपट्टी करून तिथे राष्ट्रपती राजवट आणण्याची गरज आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनीभाजपा सरकारला लक्ष्य केले. 

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करा - ठाकरे

मागील काही दिवसांपासून व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने मणिपूरमधील भीषण अवस्था जगासमोर आणली. इथे काही टाळक्यांनी विवस्त्र अवस्थेत महिलांची धिंड काढून माणुसकीला काळीमा फासली. सातत्याने महिलांवर होत असलेला अत्याचार, हत्या आणि जाळपोळ यामुळे मणिपूर आजही हिंसाचाराच्या आगीने धगधगत आहे. 

दरम्यान, मणिपूरमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा यासाठी मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचार सुरु झाला होता. राज्याच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के असलेला मैतेई समुदाय प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतो. तर नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ४० टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीAditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपा