शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Rahul Gandhi : "पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रायलची जास्त काळजी आणि...", राहुल गांधींचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 16:26 IST

मिझोरामधील निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी येथील आयझॉलमधील राजभवनाजवळील एक सभेला संबोधित केले. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (१६ सप्टेंबर) मणिपूर हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींना इस्रायलची जास्त काळजी आहे, असे सांगत भाजप केवळ द्वेष पसरवण्याचे काम करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, मिझोरामधील निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी येथील आयझॉलमधील राजभवनाजवळील एक सभेला संबोधित केले. 

यावेळी, मणिपूर आता एक राज्य राहिले नाही, तर जातीच्या आधारावर दोन राज्यांमध्ये विभागले आहे. १९८६ मध्ये शांतता करारावर स्वाक्षरी करून बंडखोरीग्रस्त ईशान्येकडील राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला होता, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला इस्रायलमध्ये काय घडत आहे? याबद्दल अधिक स्वारस्य आहे, परंतु मणिपूरमध्ये काय घडत आहे, याची त्यांना चिंता नाही, हे आश्चर्यकारक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

मणिपूरमध्ये लोक मारले जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, एकमेकांचा आदर करणे, सहिष्णुता बाळगणे, एकमेकांच्या धर्म आणि भाषेतून शिकणे ही भारताची विचारधारा आहे, मात्र भाजप त्यावर हल्ला करत आहे. भाजप द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तर, मे महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाला होता.

हमास-इस्रायल यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवसदरम्यान, ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. त्याचवेळी गाझा पट्टीतून हमास आणि लेबनानमधून हिजबुल्लाह इस्त्रायलवर सातत्याने रॉकेट डागत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत २७९९ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ७२४ हून अधिक मुलं आणि ३७० हून अधिक महिलांचा समावेश आहे. तर १० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा