शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पाकचा हा निर्णय म्हणजे 'मियां की दौड़ मस्जिद तक', भारताने साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 20:01 IST

 'आम्ही आमचा दृष्टीकोन काय आहे हे स्पष्ट केले आहे. आमचा दृष्टीकोन प्रगतीशील आहे. दुसरीकडे मात्र असेही देश आहेत, जे कालच्या मुद्द्यांवर आपले लक्ष केंद्रीत करत आहेत.

न्यू यॉर्क, दि. 17 - संयुक्त राष्ट्रांत (यूएन) पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उचलण्याच्या निर्णयाला भारताने उर्दू भाषेतील एक म्हण वापरून उत्तर दिलं आहे.   संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी असलेले सैयद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचे नाव न घेता 'त्यांचा हा निर्णय म्हणजे मियां की दौड मस्जिद तक' आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

'जो मुद्दा गेल्या दशकांपासून संयुक्त राष्ट्राकडे प्रलंबित आहे अशा मुद्द्यावर जर ते (पाकिस्तान) लक्ष केंद्रीत करत असतील, तर त्यांचे असे करणे म्हणजे 'मियां की दौड मस्जिद तक की', अशाच प्रकारचे असेल' असं अकबरुद्दीन पुढे म्हणाले. 'गेली 40 वर्ष या मुद्द्यावर (काश्मीर प्रश्न) संयुक्त राष्ट्रात औपचारिक स्वरुपाचीही चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे जर हा मुद्दा कुणी उचलत असेल तर ते वेळ वाया घालवण्यासारखं असेल असं ते म्हणाले.  'आम्ही आमचा दृष्टीकोन काय आहे हे स्पष्ट केले आहे. आमचा दृष्टीकोन प्रगतीशील आहे. दुसरीकडे मात्र असेही देश आहेत, जे कालच्या मुद्द्यांवर आपले लक्ष केंद्रीत करत आहेत. अशा प्रकारचे लोक हे कालचेच लोक आहेत, अशा शब्दांत अकबरुद्दीन यांनी टीका केली.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेदरम्यान भारत आपल्या प्रगतीशील, पुरोगामी कार्यक्रमावर आपले लक्ष केंद्रीत करणार आहे अशी माहितीही अकबरुद्दीन यांनी यावेळी दिली. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी हे या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांना संबोधित करताना काश्मीरचा मुद्दा उचलणार आहेत असे स्पष्ट केले आहे. भारतातर्फे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्रात भाषण करणार आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू काश्मिर