शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

Mithun Chakraborty: 'बंगाली हिंदू बेघर, छावण्यांमध्ये खिचडी खातायत...!'; प. बंगालमधील हिंसाचारावरून मिथुन यांचा ममतांवर प्रहार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 08:20 IST

Mithun Chakraborty On Murshidabad Violence: श्चिम बंगालमधील धार्मिक हिंसाचाराला ममता बॅनर्जी याच जबाबदार आहेत, असा आरोप करत मिथुन म्हणाले, “भाजप नव्हे, तर ममता बॅनर्जी याच धार्मिक तणाव पसरवत आहेत. त्याच समाजात तेढ निर्माण करत आहेत. बंगाली हिंदू आता बेघर झाले आहेत आणि मदत छावण्यांमध्ये खिचडी खात आहेत. त्यांची चूक काय?"

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर आता भाजप नेते अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ममता या बंगाली हिंदू समाजासाठी धोका बनल्या आहेत, असे मिथुन चक्रवर्ती यांनी म्हणाले आहे. एवढेच नाही तर, बंगालमध्ये वक्फ कायदा लागू न करण्याच्या मुद्द्यावर बोलताना, ममता बॅनर्जी संविधानपेक्षा वरच्या आहेत का, त्यांना हा अधिकार कुणी दिला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

पश्चिम बंगालमधील धार्मिक हिंसाचाराला ममता बॅनर्जी याच जबाबदार आहेत, असा आरोप करत मिथुन म्हणाले, “भाजप नव्हे, तर ममता बॅनर्जी याच धार्मिक तणाव पसरवत आहेत. त्याच समाजात तेढ निर्माण करत आहेत. बंगाली हिंदू आता बेघर झाले आहेत आणि मदत छावण्यांमध्ये खिचडी खात आहेत. त्यांची चूक काय?" मिथुन चक्रवर्ती इंडिया टुडेसोबत बोलत होते.

"ममता बॅनर्जी संविधानापेक्षा मोठ्या नाहीत" -ममता बॅनर्जी यांनी नुकतेच मुर्शिदाबादमधील हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे म्हणत, यात बीएसएफ, केंद्रीय संस्था आणि भाजपचा हात आहे. त्यांनीच बांगलादेशातील लोकांची घुसखोरी होऊ दिली,  असल्याचा आरोप केला होता. यावर, मिथुन यांनी ममतांचे हे विधान दिशाभूल करणारे असून त्या मुस्लीम समाजाला जाणूनबुजून भरकटवत आहेत. तसेच, "एक असा कायदा जो भारताच्या संसदेत पास झाला आहे. तो लागू न करण्याची शक्ती ममतांना कुणी दिली? त्या केवळ एक मुख्यमंत्री आहेत. त्या संविधानापेक्षा मोठ्या नाहीत."

यावेळी मिथुन यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केली. तसेच, आता बंगालमधील हिंदू समजा संघटित होत आहे. एवढेच नाही तर, ममता बॅनर्जी यांच्या हस्ते जगन्नाथ मंदिराच्या उद्घाटनावरूनही त्यांनी निशाना साधला आहे. ते म्हणाले, "आता त्यांना काहीही वाचवू शकणार नाही. त्यांचा खेळ हिंदूंच्या लक्षात आला आहे."

 

टॅग्स :Mithun Chakrabortyमिथुन चक्रवर्तीMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालHinduहिंदूMuslimमुस्लीमBJPभाजपा