शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:20 IST

साक्षीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले, पण ना तिचा मृतदेह सापडला, ना ती जिवंत असल्याचा कोणताही पुरावा मिळाला.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी राहणारी एक महिला टेलीकॉलर गेल्या २२ दिवसांपासून बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले, पण ना तिचा मृतदेह सापडला, ना ती जिवंत असल्याचा कोणताही पुरावा मिळाला. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. गायब झालेल्या तरुणीचे नाव साक्षी वर्मा आहे. ती 'यूपी ११२' या हेल्पलाईन नंबरवर टेलीकॉलर म्हणून काम करत होती. ती २९ ऑगस्ट रोजी घरातून बाहेर पडली आणि दोन तासांतच बेपत्ता झाली. या प्रकरणी पोलिसांनी तिच्यासोबत असलेल्या सचिन नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?साक्षीची आई संगीता यांनी ३० ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. यात त्यांनी जौनपूरच्या सचिन उर्फ कृष्णा जायसवाल याच्यावर मुलीला सोबत घेऊन गेल्याचा आरोप केला. पोलिसांनी तपास केला असता, २९ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० पर्यंत साक्षी आणि सचिन दोघेही १०९० चौकाजवळ एकत्र होते, असे दिसून आले. त्यानंतर त्यांचे फोन बंद झाले आणि ते सीसीटीव्ही फुटेजमधूनही गायब झाले. सचिन त्यानंतर रिवर फ्रंटवर एकटाच फिरताना दिसला. एका आईस्क्रीमवाल्याने सांगितले की, दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता आणि त्यानंतर कोणीतरी नदीत उडी मारल्याचा संशय त्याला आहे.

सचिनने काय सांगितले?साक्षी बेपत्ता झाल्यावर सचिनने आपली स्कूटी चारबाग येथे सोडून दिली आणि तो भोपाळला पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ५ सप्टेंबर रोजी त्याला भोपाळमधून अटक केली. त्याच्याकडून साक्षीचा फोनही जप्त करण्यात आला. सचिनने पोलिसांना सांगितले की, भांडणानंतर त्याने साक्षीचा फोन हिसकावून घेतला आणि तिला तिथेच सोडून तो निघून गेला. त्यानंतर ती कुठे गेली, याची त्याला काहीही कल्पना नाही. सचिनची आणि साक्षीची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. तिथूनच त्यांच्यात प्रेम फुलायला सुरुवात झाली होती.

गोमती नदीत २५ किलोमीटरपर्यंत शोधमोहीम!या घटनेनंतर पोलिसांनी एसडीआरएफच्या टीमसह गोमती नदीत २५ किलोमीटरपर्यंत शोधमोहीम राबवली. दोन दिवस ही मोहीम चालली, पण साक्षीचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यानंतर ही शोधमोहीम थांबवण्यात आली. पोलिसांनी लखनौव्यतिरिक्त बाराबंकी, सुलतानपूर, सीतापूर, रायबरेली आणि हरदोई यांसारख्या आसपासच्या जिल्ह्यांतही साक्षीचा शोध घेतला, पण काहीही हाती लागले नाही.

आईने केली एसआयटी चौकशीची मागणीसाक्षी आणि सचिन यांच्यात ज्या तिसऱ्या व्यक्तीवरून वाद झाला होता, तो साक्षीचाच नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याचीही चौकशी केली आहे. दरम्यान, साक्षीच्या आईने या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखा किंवा एसआयटी मार्फत करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून यामागचे सत्य समोर येईल. साक्षीच्या आईचा दावा आहे की, तिच्या मुलीचे अपहरण झाले आहे. तिने साक्षीचा मित्र सचिनवर तिला फसवल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश