शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:28 IST

आतापर्यंत एकूण २१ मतदारांची ओळख पटली आहे. ज्यांना चुकीच्या पद्धतीने मृत घोषित करण्यात आले आहे. यातील १० लोकांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षणात जिवंत व्यक्तीला मृत समजून त्याचे नाव हटवण्यात आल्याचं समोर आले आहे. गुरुवारी एक मतदार थेट पटना येथील राज्य मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयात पोहचला. भोजपूर जिल्ह्यात राहणारा मिंटू पासवान याचे मतदार यादी पुनरीक्षणात मृतकांच्या यादीत नाव टाकले आहे. परंतु मी जिवंत आहे असं सांगायला हा मतदार निवडणूक कार्यालयात पोहचला होता. मिंटूसारखे अनेक मतदार आता पुढे येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

मिंटू पासवान यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, बिहारच्या एसआरए यादीत माझे नाव मृतकांमध्ये आहे. मतदार यादी पुनरीक्षणासाठी बूथ पातळीवरील कुणीही पदाधिकारी माझ्या घरी आले नाहीत असं सांगितले. डाव्या पक्षाचे शिष्टमंडळाने मिंटू पासवान यांना राज्य निवडणूक कार्यालयात आणले होते. याच आठवड्यात मिंटू पासवान सुप्रीम कोर्टात जात मी जिवंत असल्याचे सांगितल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. मतदार यादीतील या घोळामुळे SIR चा बिहारमध्ये विरोध होत आहे. मतदार यादीतून मृत म्हणून नाव हटवल्यानंतर आता निवडणूक आयोगाने मिंटू पासवान यांना पुन्हा फॉर्म ६ भरून मतदार नोंदणी करण्यास सांगितले आहे. 

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मिंटू पासवान यांना संबंधित बीएलओकडे फॉर्म जमा करण्यास सांगितले आहे. स्वत: बीएलओने त्यांची चूक कबूल करत अन्य व्यक्तीच्या जागी मिंटू पासवान यांचं नाव यादीत खोडल्याचं सांगितले. जर बीएलओ खरे बोलत असतील तर त्या मृत व्यक्तीचे नाव ड्राफ्ट मतदार यादीत असायला हवे. मात्र निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे मिंटू पासवान यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय असा आरोप केला जात आहे. 

दरम्यान, आतापर्यंत एकूण २१ मतदारांची ओळख पटली आहे. ज्यांना चुकीच्या पद्धतीने मृत घोषित करण्यात आले आहे. यातील १० लोकांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली तेव्हा त्यांनी यादीतून काढून टाकलेल्या ६५ लाख लोकांचा डेटा सार्वजनिक का केला नाही? असा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला आहे. नागरिकांचे अधिकार राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून राहू नयेत. मसुदा यादीतील मृत किंवा जिवंत लोकांबद्दल गंभीर वाद आहेत. अशा लोकांना ओळखण्यासाठी तुमच्याकडे कोणती यंत्रणा आहे, तुम्ही काढून टाकलेल्या लोकांची यादी वेबसाइटवर टाका, जेणेकरून लोकांना वास्तवाची जाणीव होईल, असे न्यायालयाने म्हटलं आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय