शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:28 IST

आतापर्यंत एकूण २१ मतदारांची ओळख पटली आहे. ज्यांना चुकीच्या पद्धतीने मृत घोषित करण्यात आले आहे. यातील १० लोकांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षणात जिवंत व्यक्तीला मृत समजून त्याचे नाव हटवण्यात आल्याचं समोर आले आहे. गुरुवारी एक मतदार थेट पटना येथील राज्य मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयात पोहचला. भोजपूर जिल्ह्यात राहणारा मिंटू पासवान याचे मतदार यादी पुनरीक्षणात मृतकांच्या यादीत नाव टाकले आहे. परंतु मी जिवंत आहे असं सांगायला हा मतदार निवडणूक कार्यालयात पोहचला होता. मिंटूसारखे अनेक मतदार आता पुढे येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

मिंटू पासवान यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, बिहारच्या एसआरए यादीत माझे नाव मृतकांमध्ये आहे. मतदार यादी पुनरीक्षणासाठी बूथ पातळीवरील कुणीही पदाधिकारी माझ्या घरी आले नाहीत असं सांगितले. डाव्या पक्षाचे शिष्टमंडळाने मिंटू पासवान यांना राज्य निवडणूक कार्यालयात आणले होते. याच आठवड्यात मिंटू पासवान सुप्रीम कोर्टात जात मी जिवंत असल्याचे सांगितल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. मतदार यादीतील या घोळामुळे SIR चा बिहारमध्ये विरोध होत आहे. मतदार यादीतून मृत म्हणून नाव हटवल्यानंतर आता निवडणूक आयोगाने मिंटू पासवान यांना पुन्हा फॉर्म ६ भरून मतदार नोंदणी करण्यास सांगितले आहे. 

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मिंटू पासवान यांना संबंधित बीएलओकडे फॉर्म जमा करण्यास सांगितले आहे. स्वत: बीएलओने त्यांची चूक कबूल करत अन्य व्यक्तीच्या जागी मिंटू पासवान यांचं नाव यादीत खोडल्याचं सांगितले. जर बीएलओ खरे बोलत असतील तर त्या मृत व्यक्तीचे नाव ड्राफ्ट मतदार यादीत असायला हवे. मात्र निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे मिंटू पासवान यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय असा आरोप केला जात आहे. 

दरम्यान, आतापर्यंत एकूण २१ मतदारांची ओळख पटली आहे. ज्यांना चुकीच्या पद्धतीने मृत घोषित करण्यात आले आहे. यातील १० लोकांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली तेव्हा त्यांनी यादीतून काढून टाकलेल्या ६५ लाख लोकांचा डेटा सार्वजनिक का केला नाही? असा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला आहे. नागरिकांचे अधिकार राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून राहू नयेत. मसुदा यादीतील मृत किंवा जिवंत लोकांबद्दल गंभीर वाद आहेत. अशा लोकांना ओळखण्यासाठी तुमच्याकडे कोणती यंत्रणा आहे, तुम्ही काढून टाकलेल्या लोकांची यादी वेबसाइटवर टाका, जेणेकरून लोकांना वास्तवाची जाणीव होईल, असे न्यायालयाने म्हटलं आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय