शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

‘एका स्कूटरवर ४ जण, तरूण वयात आम्हीदेखील नियम तोडले; परंतु..,’ पाहा काय म्हणाले गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 22:20 IST

नितीन गडकरींनी सांगितला जुना किस्सा. सध्या आपल्याला आपले विचार बदलण्याचीही गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. रस्ते अपघातांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. यासोबतच गडकरींनी कारमधील सेफ्टी फीचर्सबद्दलही सांगितले. भारतीय बाजारपेठेतही सहा एअरबॅग्स असलेली वाहने बाजारात आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सीट बेल्ट न लावणे हेही चुकीचे असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

आजतकशी संवाद साधताना गडकरींना सायरस मिस्त्री यांच्या निधनाबाबात प्रश्न विचारण्यात आला. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर रविवारी झालेल्या अपघातात मिस्त्री यांना आपला जीव गमवावा लागला. “अहमदाबाद-मुंबई महामार्ग अत्यंत धोकादायक आहे. तिथे ट्रॅफिक PCU 1.20 लाख आहे, जे खूप आहे. ते 20 हजार पीसीयूपर्यंत खाली आणावे लागेल,” असे गडकरी म्हणाले. “2024 पर्यंत सरकारला रस्ते अपघात 50 टक्क्यांनी कमी करायचे आहेत. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन केले जाईल,” असेही ते म्हणाले.

“कार कंपन्या इतर देशांना वाहने निर्यात करतात तेव्हा त्या सहा एअरबॅग्ज ठेवतात. परंतु भारतात चार चार एअरबॅग्ससह कार्सची विक्री होते. भारतीयांच्या जीवाची काही किंमत नाही का?, असा सवालही त्यांना करण्यात आला. यावेळी त्यांना सहा एअरबॅग्ज बसवल्यास कारची किंमत 50-60 हजार रुपयांनी वाढू शकते असा सवालही करण्यात आला. यावर बोलताना त्यांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले. मोठ्या प्रमाणात उत्पादन असेल तर एका एअरबॅगची किंमत फक्त 900 रुपये असेल, असेही गडकरींनी स्पष्ट केले.

तरूण वयात तोडले नियमतरूण वयात आपणही नियम तोडले. परंतु हे किती धोकादायक ठरू शकते याचा त्यावेळी अंदाज नव्हता. कॉलेजमध्ये असताना निवडणुकांच्या वेळी एका स्कूटरवर चार जण बसून फिरत होतो आणि दंड होऊ नये म्हणून हाताच्या मदतीनं नंबर प्लेट लपवत होतो. परंतु आता लोकांना आपले विचार बदलावे लागतील. नियमांचं पालन करावं लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCyrus Mistryसायरस मिस्त्रीIndiaभारत