शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘एका स्कूटरवर ४ जण, तरूण वयात आम्हीदेखील नियम तोडले; परंतु..,’ पाहा काय म्हणाले गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 22:20 IST

नितीन गडकरींनी सांगितला जुना किस्सा. सध्या आपल्याला आपले विचार बदलण्याचीही गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. रस्ते अपघातांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. यासोबतच गडकरींनी कारमधील सेफ्टी फीचर्सबद्दलही सांगितले. भारतीय बाजारपेठेतही सहा एअरबॅग्स असलेली वाहने बाजारात आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सीट बेल्ट न लावणे हेही चुकीचे असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

आजतकशी संवाद साधताना गडकरींना सायरस मिस्त्री यांच्या निधनाबाबात प्रश्न विचारण्यात आला. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर रविवारी झालेल्या अपघातात मिस्त्री यांना आपला जीव गमवावा लागला. “अहमदाबाद-मुंबई महामार्ग अत्यंत धोकादायक आहे. तिथे ट्रॅफिक PCU 1.20 लाख आहे, जे खूप आहे. ते 20 हजार पीसीयूपर्यंत खाली आणावे लागेल,” असे गडकरी म्हणाले. “2024 पर्यंत सरकारला रस्ते अपघात 50 टक्क्यांनी कमी करायचे आहेत. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन केले जाईल,” असेही ते म्हणाले.

“कार कंपन्या इतर देशांना वाहने निर्यात करतात तेव्हा त्या सहा एअरबॅग्ज ठेवतात. परंतु भारतात चार चार एअरबॅग्ससह कार्सची विक्री होते. भारतीयांच्या जीवाची काही किंमत नाही का?, असा सवालही त्यांना करण्यात आला. यावेळी त्यांना सहा एअरबॅग्ज बसवल्यास कारची किंमत 50-60 हजार रुपयांनी वाढू शकते असा सवालही करण्यात आला. यावर बोलताना त्यांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले. मोठ्या प्रमाणात उत्पादन असेल तर एका एअरबॅगची किंमत फक्त 900 रुपये असेल, असेही गडकरींनी स्पष्ट केले.

तरूण वयात तोडले नियमतरूण वयात आपणही नियम तोडले. परंतु हे किती धोकादायक ठरू शकते याचा त्यावेळी अंदाज नव्हता. कॉलेजमध्ये असताना निवडणुकांच्या वेळी एका स्कूटरवर चार जण बसून फिरत होतो आणि दंड होऊ नये म्हणून हाताच्या मदतीनं नंबर प्लेट लपवत होतो. परंतु आता लोकांना आपले विचार बदलावे लागतील. नियमांचं पालन करावं लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCyrus Mistryसायरस मिस्त्रीIndiaभारत