शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्नाटक राज्याचे नाव बदला, काँग्रेस सरकारच्या मंत्र्याची मोठी मागणी; सुचवलं ऐतिहासिक नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 13:02 IST

कर्नाटकच्या राजकारणात सध्या शहरांचे नामकरण करण्याचा मुद्दा गाजत आहे.

कर्नाटकच्या राजकारणात सध्या शहरांचे नामकरण करण्याचा मुद्दा गाजत आहे. विजयपुरा जिल्ह्याचे नाव बदलून १२व्या शतकातील समाजसुधारक बसवेश्वर (बसवण्णा) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे, असे कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. यासोबतच त्यांनी कर्नाटक राज्याचे नाव बदलून 'बसवा नाडू' ठेवल्यास काहीही गैर होणार नाही असेही सांगितले. 

खरं तर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी अलीकडेच रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'बंगळुरू दक्षिण' करण्याचा प्रस्ताव मांडला होता. अशातच कर्नाटकचे अवजड आणि मध्यम उद्योगमंत्री एम बी पाटील यांनी राज्याचेच नाव बदलण्याची मागणी केली आहे. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाविरोधात बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

विजयपुरा जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणीएम बी पाटील यांनी सांगितले की, सर्वप्रथम या परिसराला विजयपुरा म्हणून ओळखले जात होते. नंतर आदिल शाही राजवटीत ते विजापूर झाले. त्यानंतर पुन्हा एकदा ते विजयपुरा झाले. आता हा जिल्हा बसवेश्वर नावाने ओळखला जावा अशी मागणी अनेकांनी केली आहे. हे साहजिकच आहे कारण हा जिल्हा बसवण्णांची जन्मभूमी आहे आणि त्यात गैर काहीच नाही. खरं तर मंत्री पाटील हे विजयपुरा जिल्ह्यातील बाबलेश्वर विधानसभेचे आमदार आहेत.

"काही तांत्रिक अडचणी आहेत. विजापूरचे विजयपुरा झाले आणि बसवेश्वर झाले तर काही बाबींबाबत गैरसोय होईल. कारण अनेक ठिकाणी नाव बदलावे लागेल...अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांशी याबद्दल बोलेन आणि सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेऊ", असेही पाटील यांनी नमूद केले. खरं तर २०१४ मध्ये केंद्र सरकारने कर्नाटकच्या राजधानीसह राज्यातील १२ शहरांची नावे बदलण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर विजापूर हे विजयपुरा म्हणून ओळखले जाऊ लागले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण