शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Coronavirus: “जोपर्यंत देशातून कोरोना विषाणू नष्ट होणार नाही तोपर्यंत मी अन्न सेवन करणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 18:52 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याचा दौरा केला.

ठळक मुद्देकोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी उत्तर प्रदेश पूर्णपणे सज्ज आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळे वार्ड तयार करण्यात आले आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता योगींनी राज्यातील जनतेच्या रक्षणासाठी सर्वकाही पणाला लावले. भारतासह संपूर्ण जगातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढली आहे

एटा – उत्तर प्रदेश सरकारमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता(Mahesh Gupta) यांनी गुरुवारी मोठं विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. देशात जोपर्यंत कोरोना महामारी  (Coronavirus) नष्ट होत नाही तोपर्यंत मी अन्न सेवन करणार नाही असं मंत्री महेश गुप्ता म्हणाले आहेत. इतकचं नाही तर मागील ५ वर्षापासून अन्न सेवन न केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

महेश गुप्ता म्हणाले की, भारतात दहशतवादाचा अंत व्हावा यासाठी मी तपस्या केली होती. जोवर दहशतवाद नष्ट होत नाही तोपर्यंत अन्न सेवन करणार नाही. त्यामुळेच आज भारतात दहशतवाद अखेरच्या घटका मोजत आहे. दहशतवादाचं कंबरडं मोडलं आहे. नरेंद्र मोदी हे केवळ राष्ट्रनायक नाहीत विश्वनायक आहेत. परदेशी जमिनीवरही पंतप्रधान मोदींचा जादू चालला आहे. ब्राझीलला कोरोना काळात औषध पोहचवून त्यांनी संजीवनी दिली आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत अमेरिकाही पंतप्रधान मोदींच्या धोरणावर खुश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याचा दौरा केला. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी राज्यातील जनतेच्या रक्षणासाठी सर्वकाही पणाला लावले. आज योगींच्या तपस्येमुळेच उत्तर प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सावरून निघाला. कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी उत्तर प्रदेश पूर्णपणे सज्ज आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळे वार्ड तयार करण्यात आले आहेत. सर्व उपयोगी मशिनरी आणल्या आहेत अशी माहितीही महेश गुप्ता यांनी दिली.

भारतासह जगात कोरोना रुग्णांची संख्या वाढली

भारतासह संपूर्ण जगातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढली आहे. भारतात रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारच्या जवळपास आहे. तर, जगात गेल्या आठवड्यात कोरोनाचे ३४ लाख नवे रुग्ण समोर आले. जागतिक आरोग्य संखटनेने म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात ३.४ मिलियनहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ही संख्या या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रनांच्या म्हणण्यानुसार, मृतांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या आठवड्यात जगभरात ५७००० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी