शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

'गेल्या 3 वर्षात हजारो करोडपती भारतीयांनी देश सोडला', काँग्रेसचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 20:25 IST

Millionaires Leaving India: करोडपतींच्या स्थलांतराच्या बाबतीत चीन आणि ब्रिटेननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Millionaires Leaving India : दरवर्षी शेकडो/हजारो भारतीय परदेशात स्थलांतरित होतात. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, "2022 मध्ये 2 लाख 26 हजार भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले आहे. हा आकडा 2011 मधील 1 लाख 23 हजार पेक्षा दुप्पट आहे."

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला की, "एका जागतिक गुंतवणूक स्थलांतर सल्लागार फर्मने खुलासा केलाय की, गेल्या तीन वर्षांत 17,000 हून अधिक करोडपती भारतीयांनी देश सोडला आहे. या लोकांची एकूण संपत्ती दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे. याचे कारण म्हणजे भारतीय कॉर्पोरेट्स देशातील कर धोरण आणि मनमानी करांमुळे गेल्या 10 वर्षांपासून भीतीचा सामना करत आहेत."

"भारतातील मोठ-मोठे उद्योगपती देश सोडून सिंगापूर, यूएई, ब्रिटनसह इतर ठिकाणी स्थायिक होत आहेत. अशा प्रकारचे स्थलांतर ही चिंतेची बाब आहे," अशी टीका त्यांनी केली.

स्थलांतराच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय गुंतवणूक स्थलांतर सल्लागार फर्म Henley & Partners च्या अहवालानुसार, 2024 मध्ये 4,300 करोडपती भारतीय देश सोडून जातील आणि हे लोक UAE मध्ये स्थायिक होऊ शकतात. करोडपतींच्या स्थलांतराच्या बाबतीत भारत, चीन आणि ब्रिटननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी