शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

यावर्षी 6500 कोट्यधीश भारत सोडून जाणार; 'या' देशात राहण्याची योजना, नेमकं काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:37 IST

आपला देश सोडून परदेशात जाणाऱ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Millionaires Leave India: आपला देश सोडून चांगल्या देशात वास्तव्यास जाणे सामान्य बाब आहे. भारतातून दरवर्षी हजारो लोक परदेशात राहायला जातात. नागरिकांनी इतर देशांमध्ये स्थायिक होण्याच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुसार, 2023 मध्ये 6500 श्रीमंतांनी देश सोडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत(75000) ही संख्या कमी आहे. 

2022 मध्ये 7500 भारतीयांनी देश सोडलाजगभरात संपत्ती आणि गुंतवणूक स्थलांतरावर लक्ष ठेवणाऱ्या हेन्लेच्या अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये आपला देश सोडून इतर देशांमध्ये वास्तव्यास जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमधून या वर्षी 13,500 श्रीमंतांचे स्थलांतर होण्याची अपेक्षा आहे. या यादीत ब्रिटन तिसर्‍या क्रमांकावर आहे. इथून या वर्षी 3200 लोक देश सोडून जाण्याची शक्यता आहे. रशिया 3 हजार लोकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 

जगभरातील श्रीमंतांच्या पलायनाचा ट्रेंडतज्ञांचे असे मत आहे की, श्रीमंतांनी देश सोडणे ही फार चिंतेची बाब नाही. यामागचा युक्तिवाद असा आहे की, 2031 पर्यंत करोडपतींची लोकसंख्या सुमारे 80 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. या काळात भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ असेल. यामुळे देशातील वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि फार्मा क्षेत्रातून सर्वाधिक करोडपती निर्माण होतील. 

श्रीमंत लोक आपला देश का सोडतात?श्रीमंत लोक आपला देश का सोडतात, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. भारतातील करसंबंधित नियमांमधील गुंतागुंतीमुळे दरवर्षी हजारो श्रीमंत लोक देश सोडून जातात. जगभरातील श्रीमंतांना दुबई आणि सिंगापूरसारखी ठिकाणे सर्वात जास्त आवडतात, कारण श्रीमंत लोक अशा देशात जाणे पसंत करतात, जेथे कर संबंधित नियम लवचिक आहेत.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाrussiaरशियाchinaचीनsingaporeसिंगापूरDubaiदुबई