शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

अतिरेक्यांनी शरणागती पत्करण्यावर लष्कराचा भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 02:18 IST

एसओपीमध्ये बदल : सहा महिन्यांत १७ युवक वाचले

अंतिपुरा (जम्मू-काश्मीर) :  जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीच्या वेळी अतिरेक्यांनी शरणागती पत्करावी, यावर लष्कर सध्या भर देत आहे. यासाठी भारतीय लष्कराने दहशतवादविरोधी मोहिमेतील मानक संचालन प्रक्रियेत (एसओपी) बदल केले असून, या धोरणामुळे मागील सहा महिन्यांमध्ये १७ युवकांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे.

दक्षिण आणि मध्य काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी निपटणाऱ्या व्हिक्टर फोर्सअंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सच्या (आरआर) चार शाखांना लष्कर दिनानिमित्त चीफ ऑफ आर्मी स्टाफ युनिट प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. ५० आरआर, ४४ आरआर, ४२ आरआर व ३४ आरआरने विविध दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे व मागील वर्षी सप्टेंबरपासून सात जणांचे शरणागती पत्करण्यासाठी मन वळविले आहे. भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय मागील वर्षी करण्यात आला होता. देशाच्या राजधानी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या हस्ते यासाठी सन्मानित करण्यात आले. या शाखा कुमाऊं, राजपूत, आसाम व जाट रेजिमेंटच्या जवानांना घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.

याबाबत उपलब्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, गंभीर धोका न जुमानता लष्कराने अतिरेक्यांच्या कुटुंबीयांना चकमकीच्या ठिकाणी आणून त्यांना शस्त्रे टाकण्यास राजी केले. अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये जाहिद नामक अतिरेकी त्याच्या वडिलांशी भावपूर्वक भेटताना दिसत आहे. माझ्या मुलाचा आज दुसरा जन्म झाला, असे त्याचे वडील म्हणतानाही दिसत आहेत. हिंसेचा मार्ग सोडण्याची संधी दिल्याबद्दल आत्मसमर्पण करणारे अतिरेकी भारतीय लष्कराचे आभार मानतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. चकमकीच्या वेळी शरणागती पत्करण्याबाबतच्या मोहिमेची देखरेख करणाऱ्या व्हिक्टर फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल राशीम बाली यांनी म्हटले आहे की, या मोहिमेमुळे स्थानिक लोकांत मोठ्या प्रमाणावर सद्भावना निर्माण झाली आहे. मुख्य प्रवाहात परतण्यासाठी अद्यापही दारे खुली आहेत, याचा विश्वास यामुळे वाढीस लागला आहे. मुख्य प्रवाहात परंतु इच्छिणाऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यासाठी आमचे प्राण धोक्यात गेले तरी चालतील. मात्र, याचबरोबर बंदुका हाती घेऊन दहशतवाद पसरवू इच्छिणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरूच राहणार आहे.

कुठून आली ही कल्पना?चकमकीच्या वेळीच अतिरेक्यांचे मन वळवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची कल्पना मागील वर्षी पुढे आली. अतिरेकी समूह अल बद्रचा अतिरेकी शोएब अहमद भट याने चकमक सुरू असताना शस्त्रे टाकण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील प्रादेशिक सेनेच्या एका जवानाची हत्या करणाऱ्या समूहाचा एक भाग होता परंतु लष्कराने त्याच्या शरणागतीचा मार्ग मोकळा केला व त्याला चौकशीनंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथून ही कल्पना पुढे आली व तिचा विस्तार करण्यात आला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी