शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अतिरेक्यांनी शरणागती पत्करण्यावर लष्कराचा भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 02:18 IST

एसओपीमध्ये बदल : सहा महिन्यांत १७ युवक वाचले

अंतिपुरा (जम्मू-काश्मीर) :  जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीच्या वेळी अतिरेक्यांनी शरणागती पत्करावी, यावर लष्कर सध्या भर देत आहे. यासाठी भारतीय लष्कराने दहशतवादविरोधी मोहिमेतील मानक संचालन प्रक्रियेत (एसओपी) बदल केले असून, या धोरणामुळे मागील सहा महिन्यांमध्ये १७ युवकांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे.

दक्षिण आणि मध्य काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी निपटणाऱ्या व्हिक्टर फोर्सअंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सच्या (आरआर) चार शाखांना लष्कर दिनानिमित्त चीफ ऑफ आर्मी स्टाफ युनिट प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. ५० आरआर, ४४ आरआर, ४२ आरआर व ३४ आरआरने विविध दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे व मागील वर्षी सप्टेंबरपासून सात जणांचे शरणागती पत्करण्यासाठी मन वळविले आहे. भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय मागील वर्षी करण्यात आला होता. देशाच्या राजधानी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या हस्ते यासाठी सन्मानित करण्यात आले. या शाखा कुमाऊं, राजपूत, आसाम व जाट रेजिमेंटच्या जवानांना घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.

याबाबत उपलब्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, गंभीर धोका न जुमानता लष्कराने अतिरेक्यांच्या कुटुंबीयांना चकमकीच्या ठिकाणी आणून त्यांना शस्त्रे टाकण्यास राजी केले. अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये जाहिद नामक अतिरेकी त्याच्या वडिलांशी भावपूर्वक भेटताना दिसत आहे. माझ्या मुलाचा आज दुसरा जन्म झाला, असे त्याचे वडील म्हणतानाही दिसत आहेत. हिंसेचा मार्ग सोडण्याची संधी दिल्याबद्दल आत्मसमर्पण करणारे अतिरेकी भारतीय लष्कराचे आभार मानतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. चकमकीच्या वेळी शरणागती पत्करण्याबाबतच्या मोहिमेची देखरेख करणाऱ्या व्हिक्टर फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल राशीम बाली यांनी म्हटले आहे की, या मोहिमेमुळे स्थानिक लोकांत मोठ्या प्रमाणावर सद्भावना निर्माण झाली आहे. मुख्य प्रवाहात परतण्यासाठी अद्यापही दारे खुली आहेत, याचा विश्वास यामुळे वाढीस लागला आहे. मुख्य प्रवाहात परंतु इच्छिणाऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यासाठी आमचे प्राण धोक्यात गेले तरी चालतील. मात्र, याचबरोबर बंदुका हाती घेऊन दहशतवाद पसरवू इच्छिणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरूच राहणार आहे.

कुठून आली ही कल्पना?चकमकीच्या वेळीच अतिरेक्यांचे मन वळवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची कल्पना मागील वर्षी पुढे आली. अतिरेकी समूह अल बद्रचा अतिरेकी शोएब अहमद भट याने चकमक सुरू असताना शस्त्रे टाकण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील प्रादेशिक सेनेच्या एका जवानाची हत्या करणाऱ्या समूहाचा एक भाग होता परंतु लष्कराने त्याच्या शरणागतीचा मार्ग मोकळा केला व त्याला चौकशीनंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथून ही कल्पना पुढे आली व तिचा विस्तार करण्यात आला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी