शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्रालयानं उचललं मोठं पाऊल, 'सायबर कमांडो' विंग स्थापन करणार, सर्व राज्यांना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 13:34 IST

गृह मंत्रालयाने एक पत्र लिहून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व पोलिस दलातील दहा योग्य 'सायबर कमांडो' निवडण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : सतत वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय गृह मंत्रालय मोठे पाऊल उचलणार आहे. भारत आता सायबर हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी आगामी स्तरावरील तयारी करत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 'सायबर कमांडो'ची एक विंग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विंगमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील तसेच केंद्रीय पोलीस संघटनांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणारआहे. यासाठी, गृह मंत्रालयाने एक पत्र लिहून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व पोलिस दलातील दहा योग्य 'सायबर कमांडो' निवडण्यास सांगितले आहे.

सायबर कमांडो विंग स्थापन करण्याचा विचार या वर्षाच्या सुरुवातीला समोर आला. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीपी/आयजी परिषदेदरम्यान सायबर कमांडो विंग स्थापनेची शिफारस केली होती. एका हिंदी न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रात असे म्हटले आहे की, विशेष नवीन विंग सायबर सुरक्षा धोक्यांचा सामना करेल. माहिती आणि तंत्रज्ञानाचे संरक्षण करेल आणि सायबर स्पेसमध्ये तपास करेल.

जानेवारी 2023 मध्ये झालेल्या डीजीपी/आयजीपी परिषदेत पंतप्रधानांनी  शिफारस केली होती की, सायबर सुरक्षा हल्ल्यांचा सामना करण्यासाठी, माहिती तंत्रज्ञान नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी, तपास करण्यासाठी योग्य प्रशिक्षित 'सायबर कमांडो'ची विशेष शाखा स्थापन झाली पाहिजे. ज्याचे सायबर स्पेस आणि पोलीस आणि सरकारी संस्थांच्या सायबर सुरक्षेच्या गरजा सतत पणे पूर्ण करणे हे काम असेल, असे पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, या प्रस्तावानुसार सायबर कमांडो विंग हा पोलिस संघटनांचा अविभाज्य भाग असेल. त्यात असे कमांडो असतील जे आयटी सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक क्षेत्रातील जाणकार आणि पात्र असतील. प्रस्तावित सायबर कमांडो विंग पोलीस संघटनेचा अविभाज्य भाग असेल. राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय पोलिस संघटना/सीएपीएफ यांच्याकडून घेतलेल्या योग्य प्रशिक्षित आणि सुसज्ज पोलिस कर्मचार्‍यांकडून त्याचे व्यवस्थापन केले जाईल. 

सायबर कमांडोना दिले जाईल प्रशिक्षण गृह मंत्रालयाच्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आयटी सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक क्षेत्रातील त्यांच्या विद्यमान ज्ञान आणि योग्यतेच्या आधारे 'सायबर कमांडोज' सर्व श्रेणीतील सेवा कर्मचार्‍यांमधून निवडले जातील आणि त्यांना खास डिझाइन केलेले निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पार करावा लागेल. माध्यमातून निवडलेल्या कमांडोना प्रशिक्षण मिळेल आणि ते सायबर धोक्यांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक यंत्रणांनी सुसज्ज असतील. देशाच्या सायबर पायाभूत सुविधांसाठीही ते जबाबदार असतील.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञानCrime Newsगुन्हेगारी