शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

गृहमंत्रालयानं उचललं मोठं पाऊल, 'सायबर कमांडो' विंग स्थापन करणार, सर्व राज्यांना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 13:34 IST

गृह मंत्रालयाने एक पत्र लिहून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व पोलिस दलातील दहा योग्य 'सायबर कमांडो' निवडण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : सतत वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्रीय गृह मंत्रालय मोठे पाऊल उचलणार आहे. भारत आता सायबर हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी आगामी स्तरावरील तयारी करत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 'सायबर कमांडो'ची एक विंग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विंगमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील तसेच केंद्रीय पोलीस संघटनांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणारआहे. यासाठी, गृह मंत्रालयाने एक पत्र लिहून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व पोलिस दलातील दहा योग्य 'सायबर कमांडो' निवडण्यास सांगितले आहे.

सायबर कमांडो विंग स्थापन करण्याचा विचार या वर्षाच्या सुरुवातीला समोर आला. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीपी/आयजी परिषदेदरम्यान सायबर कमांडो विंग स्थापनेची शिफारस केली होती. एका हिंदी न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रात असे म्हटले आहे की, विशेष नवीन विंग सायबर सुरक्षा धोक्यांचा सामना करेल. माहिती आणि तंत्रज्ञानाचे संरक्षण करेल आणि सायबर स्पेसमध्ये तपास करेल.

जानेवारी 2023 मध्ये झालेल्या डीजीपी/आयजीपी परिषदेत पंतप्रधानांनी  शिफारस केली होती की, सायबर सुरक्षा हल्ल्यांचा सामना करण्यासाठी, माहिती तंत्रज्ञान नेटवर्कचे संरक्षण करण्यासाठी, तपास करण्यासाठी योग्य प्रशिक्षित 'सायबर कमांडो'ची विशेष शाखा स्थापन झाली पाहिजे. ज्याचे सायबर स्पेस आणि पोलीस आणि सरकारी संस्थांच्या सायबर सुरक्षेच्या गरजा सतत पणे पूर्ण करणे हे काम असेल, असे पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, या प्रस्तावानुसार सायबर कमांडो विंग हा पोलिस संघटनांचा अविभाज्य भाग असेल. त्यात असे कमांडो असतील जे आयटी सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक क्षेत्रातील जाणकार आणि पात्र असतील. प्रस्तावित सायबर कमांडो विंग पोलीस संघटनेचा अविभाज्य भाग असेल. राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय पोलिस संघटना/सीएपीएफ यांच्याकडून घेतलेल्या योग्य प्रशिक्षित आणि सुसज्ज पोलिस कर्मचार्‍यांकडून त्याचे व्यवस्थापन केले जाईल. 

सायबर कमांडोना दिले जाईल प्रशिक्षण गृह मंत्रालयाच्या पत्रात पुढे म्हटले आहे की, आयटी सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक क्षेत्रातील त्यांच्या विद्यमान ज्ञान आणि योग्यतेच्या आधारे 'सायबर कमांडोज' सर्व श्रेणीतील सेवा कर्मचार्‍यांमधून निवडले जातील आणि त्यांना खास डिझाइन केलेले निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पार करावा लागेल. माध्यमातून निवडलेल्या कमांडोना प्रशिक्षण मिळेल आणि ते सायबर धोक्यांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक यंत्रणांनी सुसज्ज असतील. देशाच्या सायबर पायाभूत सुविधांसाठीही ते जबाबदार असतील.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञानCrime Newsगुन्हेगारी