शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

मनरेगात महाराष्ट्रात एससी कुटुंबांना फक्त ९.८७ टक्के रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 23:32 IST

महाराष्ट्रात फक्त ९.८७ टक्के एससी आणि २७.४७ टक्के एसटी कुटुंबांनीच या योजनेत काम केले.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : दरवर्षी किमान १०० दिवस रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीच्या (एसटी) लोकांना कमी संधी मिळत आहे.

योजनेअंतर्गत काम करण्यांमध्ये एससी श्रेणीत २०.९९ टक्के, एसटीचे १८.७८ टक्के कुटुंबे होती तर सर्वात जास्त ६०.२२ टक्के कुटुंबे ही गैर एससी-एसटी श्रेणीतील होती. महाराष्ट्रात फक्त ९.८७ टक्के एससी आणि २७.४७ टक्के एसटी कुटुंबांनीच या योजनेत काम केले.२८ मे रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात मनरेगात काम करणारी २.०७ कोटी कुटुंबांपैकी १.२४ टक्के गैर एससी-एसटी श्रेणीतील आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबाची संख्या अनुक्रमे ४३.५१ लाख आणि ३८.९२ लाख होती.

ग्रामीण विकास मंत्रालय राबवत असलेल्या या योजनेत ज्या राज्यांत गैर एससी-एसटी श्रेणीतील कुटुंबांचे प्रतिनिधित्व जास्त होते त्यात बिहार (८४.९६ टक्के), आसाम (८०.५३ टक्के), उत्तराखंड (८०.०६ टक्के), केरळ (७५.९० टक्के), जम्मू-कश्मीर (७३.८७ टक्के) आणि कर्नाटकचा (७२.११ टक्के) समावेश आहे. संख्येचा विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त २१.१४ लाख गैर एससी/एसटी कुटुंबांनी मनरेगात काम केले.

लॉकडाउन दरम्यान सुरू झालेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रात मनरेगाअंतर्गत एकूण ५.०१ लाख कुटुंबांनी मनरेगात काम केले. त्यात ३.१४ लाख (६२.६५ टक्के) गैर एससी/एसटी श्रेणीतील होते. राज्यात एससी श्रेणीतील ४९,४९६ (९.८७ टक्के) आणि एसटीचे १.३७ लाख (२७.४७ टक्के) कुटुंबांचा समावेश होता.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार