शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

"प्रत्येक वेळी पुरुषच चुकीचा नसतो"; लैंगिक छळाच्या प्रकरणात कोर्टाने असे का म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 19:20 IST

लैंगिक छळाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने नेहमीच पुरुषाची चूक नसते असं म्हटलं आहे.

Allahabad High Court : लैंगिक छळाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात हायकोर्ट सुनावणी घेत होते. यावेळी कोर्टाने महिलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कायदे केले जात असले तरी नेहमी चूक पुरुषाचीच नसते, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये पुरावे सादर करण्याचा भार तक्रारदार आणि आरोपी दोघांवर असतो. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी आणि न्यायमूर्ती नंद प्रभा शुक्ला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यावेळी लैंगिक छळाशी संबंधित कायदे हे महिला केंद्रित आहेत यात शंका नसल्याचे खंडपीठाने म्हटलं.

आरोपी पुरुषाच्या निर्दोष मुक्ततेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर हायकोर्टाने ही प्रतिक्रिया दिली. आरोपींविरुद्ध एससी-एसटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने २०१९ मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपीने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि लग्न करण्याचे वचन दिले होते. मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला. एवढेच नाही त्याने माझ्याविरुद्ध जातीवाचक शब्दही वापरला, असा आरोप महिलेने केला होता. त्यावर सुनावणी घेताना कोर्टाने लैगिंक छळाशी संबधित कायद्यांचा उद्देश महिलांच्या सन्मानाचे आणि सन्मानाचे रक्षण करणे आहे. पण हे देखील लक्षात ठेवावे लागेल की पुरुष नेहमीच चुकीचे असतात असे नाही, असं म्हटलं आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर २०२० मध्ये आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र ट्रायल कोर्टाने २०२३ मध्ये बलात्कार प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. दोघांमधील संबंध सहमतीने असल्याचे आरोपीने कोर्टात सांगितले होते. आरोपीने दावा केला की तक्रारदार महिला ही एका विशिष्ट समाजाची नाही हे कळल्यावर त्याने त्या महिलेशी लग्न करण्यास नकार दिला होता. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर कोर्टाला कळालं की, आरोप करणाऱ्या महिलेचे २०१० मध्ये एका पुरुषाशी लग्न झाले होते, मात्र दोन वर्षानंतर ती वेगळी राहू लागली.

कोर्टाला तपासात आढळून आले की तक्रारदार महिलेने तिच्या पहिल्या लग्नाबाबत आरोपीला कोणतीही कल्पना दिली नव्हती. याच्यासोबत स्वतःच्या जातीची चुकीची माहिती दिली होती. हे सगळं कळाल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने ट्रायल कोर्टाने दिलेला निर्णय बरोबर असल्याचे म्हटलं. मात्र एससी-एसटी कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवताना हायकोर्टाने म्हटलं की, आजही समाजातील कोणत्याही नातेसंबंधाचे लग्नात रूपांतर होण्यासाठी जात महत्त्वाची असते. पीडित महिलेने जातीबद्दल खोटी माहिती का दिली आणि त्याची गरज काय होती हे सिद्ध करण्यात तक्रारदार महिला अपयशी ठरल्याचे खंडपीठाने हा निर्णय दिलाय असेही कोर्टाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी