शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

भारत आणि व्हीएतनाममध्ये सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 15:38 IST

नवी दिल्ली- व्हीएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाई क्वांग तीन दिवासंच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज भारत आणि व्हीएतनाम या दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये व्यापार, कृषी, अणुऊर्जा अशा विविध विषयांचा समावेश आहे. त्रान यांच्या भारतभेटीच्यावेळेस बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन होईल आणि सार्वभौमत्त्वाचा ...

नवी दिल्ली- व्हीएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाई क्वांग तीन दिवासंच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज भारत आणि व्हीएतनाम या दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये व्यापार, कृषी, अणुऊर्जा अशा विविध विषयांचा समावेश आहे. त्रान यांच्या भारतभेटीच्यावेळेस बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन होईल आणि सार्वभौमत्त्वाचा सन्मान राहिल अशा मुक्त, स्वतंत्र, भरभराटीस येणाऱ्या इंडो-पॅसिफिक प्रदेशाची निर्मिती करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील असे वक्तव्य केले आहे. चीनच्या या प्रदेशातील हातपाय पसरण्याच्या वृत्तीला ही मोठी चपराक म्हणावी लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्रान क्वांग यांची भेट झाल्यावर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनामध्ये भारताने व्हीएतनामची भारताच्या अॅक्ट इस्ट धोरणात महत्त्वाची भूमिका असून आग्नेय आशियांशी असलेल्या संबंधांमध्येही त्याचे महत्त्व मोठे आहे असे म्हटले आहे. तत्पुर्वी नरेंद्र मोदी आणि क्वांग यांनी दोन्ही देशांनी संरक्षण, पर्यटन, ऊर्जा, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषय या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही व्हीएतनामचे राष्ट्राध्यक्ष क्वांग यांची भेट घेतली असून तत्पुर्वी सकाळी क्वांग यांचे राष्ट्रपती भवन येथे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.क्वांग काल शुक्रवारी भारतात आले असून त्यांनी बिहारमध्ये बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगयालाही भेट दिली. आज संध्याकाळी ते भारत- व्हीएतनाम उद्योग फोरमला उपस्थित राहातील.

 

टॅग्स :IndiaभारतVietnamविएतनाम