शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

काश्मीरमधील शांतता चर्चेचे मेहबुबा मुफ्ती यांनी केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 20:39 IST

केंद्र सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीरमधील घटकांशी चर्चा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्वागत केले आहे.

श्रीनगर - केंद्र सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीरमधील घटकांशी चर्चा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्वागत केले आहे. काश्मिरमधील जनता सध्या बंदुकांमध्ये अडकून पडली आहे आणि त्यांना त्यामधून बाहेर पडायचे आहे, असे त्या म्हणाल्या. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्यातील घटकांशी चर्चा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केली होती. तसेच या चर्चेसाठी आयबीचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मेहबुबा यांनी आपले मत मांडले. मेहबुबा म्हणाल्या, "दिनेश्वर शर्मा चांगले व्यक्ती आहेत. त्यांची विश्वसनीयता अधिक आहे. तसेच  उत्तर-पूर्वेतील चर्चेमध्येही ते सहभागी होते. ही एक चांगली सुरुवात आहे. तसेच यावेळी त्याची गरजही आहे. त्यामुळे मी या निर्णयाचे स्वागत करते." दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केवळ काश्मीरमधील जनतेशी चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही तर पाकिस्तानशीसुद्धा चर्चा झाली पाहिजे असे मत मांडले आहे.  ऑपरेशन ऑलआऊटच्या माध्यमातून लष्कराने काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्यातील घटकांशी चर्चा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. काश्मीरमधील चर्चेसंबंधी राजनाथ सिंह म्हणाले, सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिनेश्वर शर्मा हे जम्मू काश्मीरमधील लोकांच्या आशा अपेक्षा समजून घेण्यासाठी चर्चा सुरू करतील. शर्मा यांना चर्चा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य असेल. दिनेश्वर शर्मा यांना कॅबिनेट सचिव पदाचा दर्जा असेल. तसेच काश्मीरमध्ये कुणासोबत चर्चा करायची, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शर्मा यांना असेल."  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्नाबाबत खूप गंभीर असल्याचेही राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले. तसेच काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यात येणार का, असे विचारले असता त्याबाबतचा अंतिम निर्णय दिनेश्वर शर्मा हेच घेतील, असेही सिंह पुढे म्हणाले.   राजनाथ सिंह पुढे म्हणाले,"काश्मीरमधील चर्चेची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तसेच यामध्ये काश्मिरी तरुणांवर विशेष लक्ष दिले जाईल. सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिनेश्वर शर्मा यांना कुठल्याही पक्षाशी चर्चा करण्याचे स्वातंत्र्य असेल." केंद्र सरकार सर्व राजकीय पक्ष आणि जम्मू आणि काश्मीरमधील सर्व पक्षांसोबत चर्चा करण्याची तयारी करत आहे. ज्यामुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा शांतता प्रक्रिया प्रस्थापित होऊ शकेल."  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरIndiaभारतGovernmentसरकार