शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील शांतता चर्चेचे मेहबुबा मुफ्ती यांनी केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 20:39 IST

केंद्र सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीरमधील घटकांशी चर्चा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्वागत केले आहे.

श्रीनगर - केंद्र सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीरमधील घटकांशी चर्चा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्वागत केले आहे. काश्मिरमधील जनता सध्या बंदुकांमध्ये अडकून पडली आहे आणि त्यांना त्यामधून बाहेर पडायचे आहे, असे त्या म्हणाल्या. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्यातील घटकांशी चर्चा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केली होती. तसेच या चर्चेसाठी आयबीचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मेहबुबा यांनी आपले मत मांडले. मेहबुबा म्हणाल्या, "दिनेश्वर शर्मा चांगले व्यक्ती आहेत. त्यांची विश्वसनीयता अधिक आहे. तसेच  उत्तर-पूर्वेतील चर्चेमध्येही ते सहभागी होते. ही एक चांगली सुरुवात आहे. तसेच यावेळी त्याची गरजही आहे. त्यामुळे मी या निर्णयाचे स्वागत करते." दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केवळ काश्मीरमधील जनतेशी चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही तर पाकिस्तानशीसुद्धा चर्चा झाली पाहिजे असे मत मांडले आहे.  ऑपरेशन ऑलआऊटच्या माध्यमातून लष्कराने काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्यातील घटकांशी चर्चा सुरू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. काश्मीरमधील चर्चेसंबंधी राजनाथ सिंह म्हणाले, सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिनेश्वर शर्मा हे जम्मू काश्मीरमधील लोकांच्या आशा अपेक्षा समजून घेण्यासाठी चर्चा सुरू करतील. शर्मा यांना चर्चा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य असेल. दिनेश्वर शर्मा यांना कॅबिनेट सचिव पदाचा दर्जा असेल. तसेच काश्मीरमध्ये कुणासोबत चर्चा करायची, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शर्मा यांना असेल."  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर प्रश्नाबाबत खूप गंभीर असल्याचेही राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले. तसेच काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यात येणार का, असे विचारले असता त्याबाबतचा अंतिम निर्णय दिनेश्वर शर्मा हेच घेतील, असेही सिंह पुढे म्हणाले.   राजनाथ सिंह पुढे म्हणाले,"काश्मीरमधील चर्चेची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तसेच यामध्ये काश्मिरी तरुणांवर विशेष लक्ष दिले जाईल. सरकारचे प्रतिनिधी म्हणून दिनेश्वर शर्मा यांना कुठल्याही पक्षाशी चर्चा करण्याचे स्वातंत्र्य असेल." केंद्र सरकार सर्व राजकीय पक्ष आणि जम्मू आणि काश्मीरमधील सर्व पक्षांसोबत चर्चा करण्याची तयारी करत आहे. ज्यामुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा शांतता प्रक्रिया प्रस्थापित होऊ शकेल."  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरIndiaभारतGovernmentसरकार