शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मेहबूबा मुफ्तींना दहशतवाद्याचा कळवळा; म्हणे मन्नान वाणी हिंसाचारातील पीडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 09:35 IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा कळवळा आला आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना  हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा कळवळा आला आहे. त्यांनी वाणीला काश्मीर हिंसाचारातील पीडित असं म्हटलं आहे. मुफ्ती यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (AMU) देशद्रोहाच्या आरोपाखाली निलंबन करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणीही मुफ्ती यांनी केली आहे. 

मन्नान वाणीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला होता. मात्र जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गुरुवारी ( 11 ऑक्टोबर ) जवान आणि दहतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यामध्ये मन्नानचा समावेश होता. मन्नानच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील केनेडी सभागृहात 15 विद्यार्थी एकत्र जमले. त्यांनी वाणीसाठी नमाज अदा करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे ही सभा घेतल्याची माहिती समोर आली होती.

मन्नान वाणीच्या मृत्यूनंतर शोकसभा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने (AMU) तीन विद्यार्थ्यांचं निलंबित केले आहे. मात्र AMU च्या विद्यार्थी संघाचा माजी नेता सज्जाद सुभानने अशा प्रकारे कोणतीही सभा झाली नसून केवळ काश्मीरच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आल्याचा दावा केला आहे. तसेच जर विद्यार्थ्यांवर असलेल्या केस मागे घेतल्या नाही तर काश्मिरी विद्यार्थी विद्यापीठ सोडून जातील असेही त्याने म्हटलं आहे. विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

विद्यापीठाने निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आता मेहबूबा मुफ्ती आणि त्यांचा पीडीपी पक्ष पुढे सरसावला आहे. मुफ्ती यांनी विद्यार्थ्यांवर दबाव टाकल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही दिला आहे. केंद्र सरकारने या गंभीर प्रकरणात हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांवरील कारवाई रद्द करावी अशी मागणी पक्षाने केली आहे. तसेच राज्य सरकारला संवेदनशीलतेने प्रकरण हाताळण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

कश्मीरमधील अमानूष हिंसाचाराचा बळी ठरलेल्या विद्यापीठातील आपल्या माजी सहकाऱ्यासाठी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित केला तर त्यात अयोग्य काय असा सवाल पीडीपीने केला आहे. AMUमधील कश्मिरी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी मूकमोर्चा काढला होता.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीMannan Waniमन्नान वानीterroristदहशतवादीDeathमृत्यूJammu Kashmirजम्मू-काश्मीर