शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

"गप्प राहिलात तर तुम्हाला राष्ट्रपती करू म्हणाले होते पण मी..."; सत्यपाल मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 18:40 IST

Satyapal Malik And Narendra Modi : तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

नवी दिल्ली - मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी सात महिन्यांनंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर ते सक्रिय राजकारणात येऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. याच दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. "आपल्याला राष्ट्रपतीपदाचे आमिष दाखवले आणि गप्प राहिलात तर तुम्हाला राष्ट्रपती बनवले जाईल" असं सांगितल्याचा मोठा दावा मलिक यांनी केला. तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. हरियाणाच्या जिंदमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

येत्या सहा ते सात महिन्यांत आपला राज्यपालपदाचा कार्यकाळ संपणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर मी उत्तर भारतातील सर्व शेतकर्‍यांना एकत्र करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे असंही मलिक यांनी सांगितलं. पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक गावांना मी भेट दिली होती. ग्रामीण भागातील जनता भाजपा नेत्यांवर प्रचंड नाराज होती. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही शेतकऱ्यांच्या संतापामुळे अनेक किलोमीटर पळावे लागले होते. गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारानंतर शीख समुदाय आणि शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून लेबल केल्याबद्दल राज्यपालांनी केंद्र सरकारवरही टीका केली.

"पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या मृत्यूवर एकही शब्दही काढला नाही"

सत्यपाल मलिक यांनी आपण 700 हून अधिक शेतकरी बांधवांना गमावले आहे. पण श्वानांच्या मृत्यूवर पत्र लिहिणाऱ्या पंतप्रधानांनी त्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवर एकही शब्दही काढला नाही म्हणत हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार एमएसपीवर कायदेशीर हमी देण्यात अपयशी ठरले आहे. पानिपतमध्ये पंतप्रधानांच्या एका मित्राने 50 एकर जमिनीवर गोदाम बांधले. त्यानंतर तीन कृषी कायदे आणले गेले. कारण त्यांना कमी भावात गहू खरेदी करून चढ्या भावात विकायचा आहे. हा सरकार आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष आहे, असे मलिक म्हणाले.

"राज्यपाल आणि राष्ट्रपती ही पदे माझ्यासाठी काहीच नाहीत"

कृषी कायदे हे मोठ्या उद्योगांच्या हितासाठी केले गेले होते, असे कृषी आंदोलनादरम्यान ते मलिक म्हणाले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने न बोलल्यास त्यांना राष्ट्रपतीपदी बढती दिली जाईल, असे भाजपामधील त्यांच्या काही मित्रांनी सांगितल्याचा दावाही मलिक यांनी केला. त्याने प्रत्येक मार्गाने आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यांच्या सर्व ऑफर नाकारल्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोललो. कारण राज्यपाल आणि राष्ट्रपती ही पदे माझ्यासाठी काहीच नाहीत, असे मलिक बोलले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण