शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

Meghalaya Election results 2018: मेघालय 'हात'चं जाऊ न देण्यासाठी काँग्रेसचे दूत रवाना, भाजपचे 'चाणक्य'ही लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 16:54 IST

राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. 

नवी दिल्ली: ईशान्य भारतातील तीन महत्त्वपूर्ण राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यापैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले असले तरी मेघालयात मात्र काँग्रेसने आपला किल्ला शाबूत राखला आहे. याठिकाणी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, परंतु त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता मेघालयात सत्तेचा सोपान चढण्यासाठी आपल्या दोन चाणक्यांना कामाला लावले आहे. मेघालयात काँग्रेस सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अहमद पटेल आणि कमल नाथ हे लगेचच शिलाँगसाठी रवाना झाले. राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. तत्पूर्वी भाजपानेही कोणत्याही परिस्थिती काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहचून देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. हेमंत बिश्व शर्मा हे लवकरच मेघालयमध्ये जातील, असे राम माधव यांनी सांगितले. यापूर्वी मणिपूर आणि गोव्यातही भाजपाच्या निकालानंतरच्या मॅनेजमेंटमुळे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे मेघालयमध्येही असाचा काही चमत्कार पाहायला मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पुन्हा मणिपूर आणि गोव्यासारखी परिस्थिती ओढावणार नाही, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अहमद पटेल आणि कमल नाथ आज दुपारी विद्यमान मुख्यमंत्री मुकूल संगमा यांची भेट घेणार असल्याचे कळते. 

टॅग्स :Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018Meghalaya Election Results 2018मेघालय निवडणूक निकाल 2018