शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नोकऱ्यांची मेगाभरती; केंद्र, राज्य सरकार भरणार 20 लाख पदं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 11:03 IST

केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदं भरणार आहे.

ठळक मुद्देकेंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदं भरणार आहे.रेल्वेत सुमारे २ लाखाहून अधिक रिक्त पदं भरण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली- देशात वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका होते आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आता पाऊलं उचलत आहे. केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदं भरणार आहे. रेल्वेतच सुमारे २ लाखाहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेगा भरतीची सुरुवात केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील २४४ कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे.

केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून या मेगाभरतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. कामगार मंत्रालय सध्या विविध खात्यांमध्ये असलेल्या रिक्त पदांची माहिती घेत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर नव्या योजनेचा योग्य आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक तत्वावर ही रिक्त पदं भरण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे.

प्रशासनावर होणार खर्च कमी करण्यासाठी नोकर भरती थांबवली होती. त्यामुळे अनेक पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त आहेत. पण, आता येत्या काही महिन्यात हे चित्र बदलणार असल्याचं समोर येतं आहे. सध्या केंद्रीय मंत्रालय स्तरावरील ६ लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत. केंद्रीय पातळीवर ही योजना यशस्वी झाल्यास राज्य पातळीवरदेखील ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. यात सुमारे २० लाख युवकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कामगार मंत्रालयाकडून लवकरच सगळ्या मंत्रालंयांना आणि सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायजेसला यासंबंधी पत्र लिहून तेथिल रिक्त जागांची माहिती दिली जाणार आहे. यामुळे मोठ्या संख्येने तरूणांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.