शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...अन् सुषमा स्वराज यांची 'ती' अंतिम इच्छा झाली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 08:36 IST

'त्या म्हणाल्या की उद्या सहा वाजता या'

नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांची अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे. सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी जेष्ठ वकील हरीश साळवे यांना कुलभूषण जाधव खटल्याची फी देण्यासाठी बोलविले होते.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव खटल्याच्या सुनावणीदरम्यान हरीश साळवे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यासाठी त्यांनी फक्त एक रुपयाचे मानधन घेण्याचे ठरविले होते. कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी झाल्यानंतर हरीश साळवे यांना त्यांची फी घेऊन जाण्यासाठी बोलविले होते. मात्र, यानंतर सुषमा स्वराज यांचे निधन झाले. सुषमा स्वराज यांनी ही अंतिम इच्छा त्यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी पूर्ण केली आहे. 

बांसुरी स्वराज यांनी शुक्रवारी हरीश साळवे यांची भेट घेऊन त्यांची फी दिली आहे. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "बांसुरीने आज तुझी अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. कुलभूषण जाधव खटल्याची एक रुपया फी, जी तू सोडून गेली होती, ती तिने हरीश साळवे यांची भेट घेऊन दिली आहे."

दरम्यान, माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे 6 ऑगस्टला निधन झाले. निधनाच्या आधी हरीश साळवे यांना त्यांची फी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना हरीश साळवे यांनी सांगितले होते की, "निधनाच्या जवळपास एक तास आधी मी सुषमा स्वराज यांच्याशी बोललो होतो. रात्री 8.50 वाजता आमची बातचीत झाली. तो अतिशय भावनिक संवाद होता. त्या म्हणाल्या की, या आणि मला भेटा. जो खटला तुम्ही जिंकला, त्यासाठी तुम्हाला तुमचा एक रुपया द्यायचा आहे. मी म्हणालो, नक्कीच, मला ती मौल्यवान फी घेण्यासाठी यायचंच आहे. मग त्या म्हणाल्या की उद्या सहा वाजता या."

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजKulbhushan Jadhavकुलभूषण जाधव