शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

डोवाल यांच्या निवासस्थानी बैठक; सलोखा राखण्याची धर्मगुरूंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:23 IST

रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात शांती व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याची ग्वाही हिंदू व मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी रविवारी दिली.

नवी दिल्ली : रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात शांती व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याची ग्वाही हिंदू व मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी रविवारी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी या धर्मगुरूंची एक बैठक पार पडली.या बैठकीला शियापंथीय मौलाना कब्ले जवाद, स्वामी चिदानंद सरस्वती, बाबा रामदेव आदी धर्मगुरु उपस्थित होते. बाबा रामदेव यांनी सांगितले की, देशातील शांती, सलोखा कायम राखण्यावर या बैठकीत एकमत झाले. रामजन्मभूमी निकालाच्या निमित्ताने वातावरण तापविण्याचा व हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न देशातील व देशाबाहेरील काही अपप्रवृत्तींकडून होण्याची शक्यता आहे याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी हिंदूंना मुस्लिमांनी व मशीद बांधण्यासाठी मुस्लिमांना हिंदूंनी सहकार्य केले पाहिजे असेही आवाहन यावेळी करण्यात आले. स्वामी चिदानंद सरस्वती म्हणाले की, भले दोन समुदाय एकाच स्थळी एकत्रितरित्या प्रार्थना करू शकणार नाहीत, मात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी दोघांनी एकत्र यायलाच हवे. राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे.>मोदी सरकारचे केले कौतुकमौलाना कल्बे जवाद यांनी सांगितले की, दोन्ही समुदायांच्या धर्मगुरूंच्या बैठकीत खेळीमेळीने चर्चा झाली. रामजन्मभूमी वादाचा संवेदनशील मुद्दा काळजीपूर्वक हाताळल्याबद्दल सर्वांनीच मोदी सरकारचे कौतुक केले.या बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात या धर्मगुरुंनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल सर्वांनी मान्य केला आहे. राष्ट्रीय हित सर्वात महत्त्वाचे असून ते जपण्यासाठी प्रयत्नशील राहाण्यावर या बैठकीत एकमत झाले.>निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना वाढीव सुरक्षानवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात ऐतिहासिक निकाल देणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांंसह पाच न्यायाधीशांच्या सुरक्षा व्यवस्थेत खबरदारीचा उपाय म्हणून वाढ करण्यात आली आहे.वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, कोणाही न्यायाधीशास धमकी आली म्हणून नव्हे तर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांनी शनिवारी सकाळी निकाल दिल्यानंतर लगेचच त्यांना वाढीव सुरक्षा लागू करण्यात आली आहे.आधी या न्यायाधीशांच्या निवासस्थानी स्थायी सुरक्षारक्षक होते. आता त्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. शिवाय निवासस्थानी जाण्याच्या रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आले असून, न्यायाधीशांना मोबाईल एस्कॉर्टही पुरविण्यात आला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर