शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

11 महीन्यानंतर शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक, शेतकऱ्यांनी केंद्राला पाठवली मृत शेतकऱ्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 15:13 IST

शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय समितीमध्ये बैठक होणार.

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सोमवारी सरकारसोबत बैठक होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय समितीमध्ये बैठक होण्याची शक्यता. युनायटेड किसान मोर्चा(SKM) ने शनिवारी MSP, कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि आंदोलकांवरील खटले मागे घेणे यासह प्रलंबित मागण्यांवर सरकारशी चर्चा करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

सोमवारची ही बैठक तब्बल 11 महिन्यांनी होणार आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात या वर्षी जानेवारी महिन्यात शेवटची चर्चा झाली होती. गेल्या सोमवारी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले, त्यानंतर या बैठकीचा निर्णय झाला. कृषी कायदे परत करावेत आणि पिकांना किमान आधारभूत किंमत(MSP) कायदेशीर हमी द्यावी या मागणीसाठी शेतकरी गेल्या एक वर्षापासून आंदोलन करत आहेत.

5 सदस्यीय समितीमध्ये शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल, अशोक धावले, शिवकुमार कक्का, गुरनाम सिंग चादुनी आणि युधवीर सिंग यांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलन संपवणार नाही. बैठकीत शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे, किमान आधारभूत किंमत कायद्यातील हमीभाव, नुकसानभरपाई आणि अन्य मागण्यांबाबतची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मृत 702 शेतकऱ्यांची यादी सरकारकडे पाठवली

शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या 702 शेतकऱ्यांची यादी केंद्राकडे पाठवण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे की, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगितले होते. देशाच्या विविध भागांतील, विशेषतः पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवर(सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डर) निदर्शने करत आहेत. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा