शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

11 महीन्यानंतर शेतकरी आणि सरकारमध्ये बैठक, शेतकऱ्यांनी केंद्राला पाठवली मृत शेतकऱ्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 15:13 IST

शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय समितीमध्ये बैठक होणार.

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सोमवारी सरकारसोबत बैठक होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय समितीमध्ये बैठक होण्याची शक्यता. युनायटेड किसान मोर्चा(SKM) ने शनिवारी MSP, कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि आंदोलकांवरील खटले मागे घेणे यासह प्रलंबित मागण्यांवर सरकारशी चर्चा करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

सोमवारची ही बैठक तब्बल 11 महिन्यांनी होणार आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात या वर्षी जानेवारी महिन्यात शेवटची चर्चा झाली होती. गेल्या सोमवारी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले, त्यानंतर या बैठकीचा निर्णय झाला. कृषी कायदे परत करावेत आणि पिकांना किमान आधारभूत किंमत(MSP) कायदेशीर हमी द्यावी या मागणीसाठी शेतकरी गेल्या एक वर्षापासून आंदोलन करत आहेत.

5 सदस्यीय समितीमध्ये शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल, अशोक धावले, शिवकुमार कक्का, गुरनाम सिंग चादुनी आणि युधवीर सिंग यांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलन संपवणार नाही. बैठकीत शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे, किमान आधारभूत किंमत कायद्यातील हमीभाव, नुकसानभरपाई आणि अन्य मागण्यांबाबतची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मृत 702 शेतकऱ्यांची यादी सरकारकडे पाठवली

शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या 702 शेतकऱ्यांची यादी केंद्राकडे पाठवण्यात आली असून, त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे की, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगितले होते. देशाच्या विविध भागांतील, विशेषतः पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमेवर(सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डर) निदर्शने करत आहेत. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा