शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कडक सॅल्यूट! पतीचं वृद्धाश्रमाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'त्यांनी' 13 वर्षे केलं नाही अन्नग्रहण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 12:02 IST

Mother teresa of marwar junction Usha Chapela : पतीचं स्वप्न साकार करण्यासाठी महिलेने कठोर परिश्रम घेतले आणि आयुष्यभर केलेल्या बचतीतून वृद्धाश्रम उभारले आहे.

नवी दिल्ली - आपलं अथवा आपल्या कुटंबीयांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही जण खूप कष्ट घेतात. अत्यंत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्य़ा गोष्टी शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी आणि कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. पतीचं वृद्धाश्रमाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका महिलेने तब्बल 13 वर्षे अन्नग्रहण केलं नसल्याची घटना समोर आली आहे. पतीचं स्वप्न साकार करण्यासाठी महिलेने कठोर परिश्रम घेतले आणि आयुष्यभर केलेल्या बचतीतून वृद्धाश्रम उभारले आहे. उषा छापेला (Usha Chapela) असं या महिलेचं नाव असून त्या मारवाडच्या रहिवासी आहेत. मारवाडच्या (Marwad) मदर तेरेसा म्हणून त्या ओळखल्या जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, पाली जिल्ह्यातील मारवाड जंक्शन येथील रहिवासी असलेल्या उषा छापेला या नरसिंहपुरा येथे शासकीय शाळेत शिक्षिका आहेत. 13 जून 2003 रोजी एका अपघातात त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांचे पती राधेश्याम छापेला हेदेखील शासकीय शाळेत शिक्षक होते. राधेश्याम छापेला यांनी वृद्धाश्रम सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पतीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा निश्चय उषा यांनी केला. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांनी 13 वर्ष अन्नग्रहणही केलं नाही. फक्त फलाहार करून राहिल्या. पतीच्या मृत्यूनंतर मिळालेल्या विमा रकमेतून त्यांनी जमीन खरेदी केली. बचत केलेली सर्व रक्कम वृद्धाश्रमाच्या उभारणीसाठी वापरली आणि अखेरीस वृद्धाश्रमाचं स्वप्न साकार झालं. 

सध्या या वृद्धाश्रमात 10 वृद्ध राहतात

वृद्धाश्रमाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पतीच्या स्मरणदिनी म्हणजेच 13 जून 2015 रोजी वृद्धाश्रम सुरू केला. या वृद्धाश्रमाचं नाव ज्ञानुषा असं ठेवण्यात आलं. सध्या या वृद्धाश्रमात 10 वृद्ध राहतात. येथे महिला-पुरुषांसाठी वेगळी स्वच्छतागृहं, हॉल, झोपण्यासाठी पलंग, स्वतंत्र कपाटं, फिरण्यासाठी बाग, मनोरंजनासाठी टीव्ही आणि म्युझिक सिस्टीम अशा सुविधा आहेत. वृद्धांना सकाळचा नाष्टा आणि दोन वेळचं जेवण देण्यासाठी दोन महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळोवेळी डॉक्टर्स येतात. वृद्धांच्या देखभालीचं काम एक तरुण करतो. मूल-बाळ नाही किंवा नातलग सेवा करू इच्छित नाही, असे बहुतांश वृद्ध येथे दाखल आहेत. 

वृद्धाश्रम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर 13 जून 2016 रोजी केलं अन्नग्रहण 

ज्या वृद्धांना मुलं आहेत, त्यांना येथे बोलावून त्यांचं समुपदेशन करून त्यांच्यासोबत वृद्धांना परत घरी पाठवून दिलं जातं. काही वृद्धांचं वय जास्त असल्यानं किंवा गंभीर आजारामुळे त्यांची सेवा करणं कठीण जातं.  हा वृद्धाश्रम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर 13 जून 2016 रोजी अन्नग्रहण केलं. तोपर्यंत मी केवळ फलाहार घेत होते असं उषा छापेला यांनी म्हटलं आहे.  पतीच्या पेन्शनमधून हा वृद्धाश्रम मी चालवते. माझा मुलगा घनश्याम छापेला आऊवा स्कूलमध्ये प्राचार्य, तर दुसरा मुलगा डॉ. दिनेश रॉय छापेला हा राजसमंदमध्ये एसडीएम आहे. गरज पडल्यावर माझी दोन्ही मुलं मला आर्थिक मदत करतात. काही व्यापारीदेखील वृद्धाश्रमासाठी मदत देतात असं उषा छापेला यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकIndiaभारत