शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

कमाल! बँकेतून कर्ज घेऊन पूर्ण केलं शिक्षण; आधी डॉक्टर आणि नंतर झाली पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:23 IST

एका सामान्य कुटुंबातील मुलीसाठी एमबीबीएस शिकणं सोपं नव्हतं. पण मीनाक्षी कात्यायन आपल्या स्वप्नांबद्दल आणि आयुष्याबद्दल स्पष्ट होत्या.

UPSC परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो उमेदवारांपैकी मोजकेच उमेदवार त्यात यशस्वी होऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. IPS मीनाक्षी कात्यायन या 2014 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. मीनाक्षी कात्यायन यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. त्यांची सक्सेस स्टोरी समोर आली आहे. 

मीनाक्षी कात्यायन या मुळच्या झारखंडची राजधानी रांचीच्या आहेत. एका सामान्य कुटुंबातील मुलीसाठी एमबीबीएस शिकणं सोपं नव्हतं. पण मीनाक्षी कात्यायन आपल्या स्वप्नांबद्दल आणि आयुष्याबद्दल स्पष्ट होत्या. काय आणि कसं करायचं ते त्यांना माहीत होतं.

मीनाक्षी कात्यायन या देशातील काही आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत ज्या डॉक्टर झाल्यानंतर सरकारी सेवेत रुजू झाल्या. देशात एमबीबीएसचे शिक्षण खूप महाग आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलीसाठी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणे कठीण होते. त्यामुळे मीनाक्षी य़ांनी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते.

मीनाक्षी यांनी एमबीबीएस केल्यानंतर एम्समध्ये ज्युनिअर डॉक्टर म्हणून काम केलं आहे. त्यांचा जन्म 12 जुलै 1982 रोजी झाला. तिचे पती एम्समध्ये डॉक्टर आहेत. मीनाक्षीने बिहारमधील बेगुसराय येथे पोलिओ निर्मूलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) काम केलं आहे.

पहिल्याच प्रयत्नात डॉ. मीनाक्षी कात्यायन या आयपीएस अधिकारी झाल्या. त्यांनी 2012 मध्ये UPSC ची परीक्षा दिली आणि त्यात त्या यशस्वी झाला आणि त्यांना UP कॅडर देण्यात आले. 2018 मध्ये त्यांना भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ पदावर बढती मिळाली. वैद्यकीय शिक्षणामुळे त्यांना गुन्ह्याचा तपास करणे सोपे जाते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी