शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

छपरा माध्यान्ह भोजन विषबाधाप्रकरणी मीना देवीला 10 वर्षांचा कारावास

By admin | Published: August 29, 2016 4:54 PM

16 जुलै 2013ला सारण जिल्ह्यातील गंडामन गावात माध्यान्ह भोजन आहारातून विषबाधा होऊन 23 मुलांचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 29 - 16 जुलै 2013ला सारण जिल्ह्यातील गंडामन गावात माध्यान्ह भोजन आहारातून विषबाधा होऊन 23 मुलांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत तत्कालीन शाळेच्या मुख्याध्यापिका मीना देवी हिला कोर्टानं 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र तिचा पती अर्जुन राय याची सर्व आरोपीतून कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी सुनावणीसाठी जवळपास 40 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यात दोन जेवण बनवणारे व्यक्ती, 22 ग्रामीण व्यक्ती, 9 डॉक्टर तसेत एसआयटीच्या 7 अधिका-यांची साक्ष घेण्यात आली. अखेर सर्व साक्षी पुराव्यांनंतर मुख्याध्यापिका मीना देवी हिला कोर्टानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

बिहारमधल्या सारण जिल्ह्यातल्या छपरापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या गंडामन गावातल्या सरकारी शाळेत माध्यान्ह भोजनात मुलांना डाळ, भात आणि सोयाबिनची भाजी खाण्यासाठी देण्यात आली होती. सोयाबिनची भाजी खाल्ल्यानं मुलांना उलट्या आणि मळमळचा त्रास जाणवू लागला. लगेचच आजारी पडल्यानं त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र मुलांची स्थिती फारच गंभीर झाल्यानं त्यांना पटनाच्या पीएमसीएच या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. उपचारादरम्यान 21 मुलांसह जेवण बनवणा-या महिलेचाही मृत्यू झाला.

विशेष म्हणजे या दुर्घटनेत जेवण बनवणा-या महिलेच्या दोन मुलांचाही मृत्यू ओढवला होता. त्यामुळे एकूण 23 मुलांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर जेवणात विष असल्याचं स्पष्ट झालं होतं.