शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

स्वच्छ भारत अभियानात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 18:39 IST

देशाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

ठळक मुद्दे देशाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.भाजपाकडून शनिवारी दिल्लीमध्ये ‘दीपावली मंगल मिलन’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.  

नवी दिल्ली- देशाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. भाजपाकडून शनिवारी दिल्लीमध्ये ‘दीपावली मंगल मिलन’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.  

दिल्लीमध्ये शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. एक काळ असा होता की, पत्रकारांना शोधावं लागायचं पण आता मात्र प्रसारमाध्यमांच्या कक्षा रूंदावल्या आहेत. त्यामुळे पत्रकार मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. लोकशाहीसाठी ही बाब निश्चितच चांगली आहे. देशात सुधारणा कशा प्रकारे व्हायला हव्यात याबाबत पत्रकार सूचना देतात, राजकारण्यांनी नेमकं कोणत्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवं, हेदेखील पत्रकारांमुळे समजतं असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारे स्वच्छ भारत अभियानाला प्रसिद्धी दिली त्यामुळेच अभियान यशस्वी झालं, असं म्हणत मोदींनी प्रसारमाध्यमांचं कौतुक केलं आहे. प्रसारमाध्यमांमुळे अभियान घरोघरी पोहचलं, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं.

या कार्यक्रमाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. दीपावली मिलन महोत्सवाची सांगता झाल्यावर अनेक पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या भाषणानंतर मोदींनी अनेक पत्रकारांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान