शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 18:27 IST

दोन दिवसापूर्वी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता भारताने प्रत्युत्तर दिले आहे.

दोन दिवसापूर्वी कॅनडानेभारतावर गंभीर आरोप केले होते, या आरोपानंतर आता भारतानेहीकॅनडावर आरोप केले आहेत. भारताकडून प्रत्यार्पणाच्या किमान २६ विनंत्या कॅनडाकडे अजूनही प्रलंबित आहेत. यावरुन भारताने कॅनडाला सुनावले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, '२६ जणांच्या प्रत्यार्पणाची प्रकरणे गेल्या दशकापासून किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित आहेत, असा आरोप त्यांनी केला. कॅनडामधील शीख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येशी भारताचा संबंध जोडल्यानंतर या आठवड्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी बिघडले आहेत. 

बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी

 रणधीर जैस्वाल म्हणाले, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक करण्याची विनंती कॅनडालाही केली होती, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही,'लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्यांच्या अटकेसाठी आम्ही कॅनडाला काही विनंत्या शेअर केल्या होत्या. त्यांनी आमच्या मुख्य समस्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. यामागे राजकीय हेतूही आहे, असाही आरोप केला. 

कॅनडाने कोणतेही पुरावे दिले नाहीत

यावेळी भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले. तसेच कॅनडाने आरोपाचे कोणतेही पुरावे दिले नसल्याचे म्हटले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, चौकशीदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेले हे भारतावरील आरोप  महत्त्वाचे आहेत हे दिसून येते. याआधी बुधवारी, ट्रूडो यांनी कबूल केले की त्यांच्याकडे फक्त गुप्तचर माहिती आहे आणि कोणतेही ठोस पुरावे नाहीत.  त्यांनी गेल्या वर्षी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.

"सध्याचे संकट ट्रुडो सरकारच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे निर्माण झाले आहे.'भारताकडून प्रत्यार्पणाच्या २६ विनंत्या कॅनडाकडे एक दशक किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित आहेत, असंही रणधीर जयस्वाल म्हणाले.

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीJustin Trudeauजस्टीन ट्रुडो