शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 18:27 IST

दोन दिवसापूर्वी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता भारताने प्रत्युत्तर दिले आहे.

दोन दिवसापूर्वी कॅनडानेभारतावर गंभीर आरोप केले होते, या आरोपानंतर आता भारतानेहीकॅनडावर आरोप केले आहेत. भारताकडून प्रत्यार्पणाच्या किमान २६ विनंत्या कॅनडाकडे अजूनही प्रलंबित आहेत. यावरुन भारताने कॅनडाला सुनावले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, '२६ जणांच्या प्रत्यार्पणाची प्रकरणे गेल्या दशकापासून किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित आहेत, असा आरोप त्यांनी केला. कॅनडामधील शीख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येशी भारताचा संबंध जोडल्यानंतर या आठवड्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी बिघडले आहेत. 

बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी

 रणधीर जैस्वाल म्हणाले, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक करण्याची विनंती कॅनडालाही केली होती, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही,'लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्यांच्या अटकेसाठी आम्ही कॅनडाला काही विनंत्या शेअर केल्या होत्या. त्यांनी आमच्या मुख्य समस्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. यामागे राजकीय हेतूही आहे, असाही आरोप केला. 

कॅनडाने कोणतेही पुरावे दिले नाहीत

यावेळी भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले. तसेच कॅनडाने आरोपाचे कोणतेही पुरावे दिले नसल्याचे म्हटले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, चौकशीदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेले हे भारतावरील आरोप  महत्त्वाचे आहेत हे दिसून येते. याआधी बुधवारी, ट्रूडो यांनी कबूल केले की त्यांच्याकडे फक्त गुप्तचर माहिती आहे आणि कोणतेही ठोस पुरावे नाहीत.  त्यांनी गेल्या वर्षी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.

"सध्याचे संकट ट्रुडो सरकारच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे निर्माण झाले आहे.'भारताकडून प्रत्यार्पणाच्या २६ विनंत्या कॅनडाकडे एक दशक किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित आहेत, असंही रणधीर जयस्वाल म्हणाले.

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीJustin Trudeauजस्टीन ट्रुडो