शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

#MeToo: केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणीत वाढ; चार महिलांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 18:19 IST

काँग्रेसकडून अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली: लैंगिक शोषणामुळे अमेरिकेत सुरू झालेलं #MeToo वादळ आता भारतात पोहोचलं आहे. बॉलीवूडनंतर या वादळानं राजकारणही ढवळून काढलं आहे. याचा पहिला धक्का मोदी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेल्या एम. जे. अकबर यांना बसला आहे. अकबर यांच्यावर चार महिलांनी सनसनाटी आरोप केले आहेत. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पत्रकार गजला वहाब यांनी एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. 1994 मध्ये 'द एशियन एज'मध्ये असताना अकबर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप गजला यांनी केला आहे. 'अकबर यांचं लिखाण मला आवडायचं. त्यामुळे मला पत्रकार व्हायचं होतं. मला त्यांच्याकडून पत्रकारिता शिकायची होती,' असं गजला यांनी म्हटलं आहे. अकबर यांच्याबद्दल मनात असलेल्या प्रतिमेला 1997 मध्ये तडा गेला. त्यांनी जवळपास 6 महिने माझ्याशी अश्लिल कृत्यं केली. विशेष म्हणजे हे सर्व त्यांच्या केबिनमध्ये घडलं, अशी व्यथा गजला यांनी मांडली आहे. सध्या सोशल मीडियावर #MeToo मोहिमेनं जोर धरला आहे. त्यामुळे गजला वहाब यांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली. आपण अत्याचारांची वाच्यता केल्यामुळे इतरही महिला अकबर यांच्याविरोधात मोकळेपणानं बोलतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर तीन महिल्यांनी अकबर यांच्यावर गंभीर आरोप केले. यामध्ये वरिष्ठ पत्रकार प्रिया रमानी, शूमा राहा आणि लेखिका प्रेरणा सिंह बिंद्रा यांचा समावेश आहे. याविषयी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांनी या प्रश्नांना बगल दिली. यावरुन काँग्रेसनं अकबर यांच्यावर निशाणा साधला आहे. अकबर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांनी केली आहे.  

टॅग्स :Metoo CampaignमीटूBJPभाजपाsex crimeसेक्स गुन्हाsexual harassmentलैंगिक छळ