शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

'माया' आटली?... 'टाळी'साठी काँग्रेसला मायावतींनी अट घातली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 20:04 IST

देशातील समस्या सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली केली आहे

नवी दिल्ली :  देशातील समस्या सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली केली आहे. यामध्ये काँग्रेससह अन्य 19 पक्षांचा समावेश आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडीवरून महाआघाडीमध्ये प्रत्येक पक्ष आपला स्वार्थ आणि अस्तित्व दाखवत असल्याचे दिसून येत आहे. महाआघाडीतील एक असेलेल्या मायावती यांनी आपल्याला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच काँग्रेसबरोबर आघाडी करणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता  महाआघाडीत बिघाडीची चिन्हे दिसू लागली आहेत. दुसरीकडे अविश्‍वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांच्या एकीचा फुगा फुटण्याचीच चिन्हे दिसल्याने दुसरीकडे भाजपाच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या असतील.  

मोदी विरोधात एकत्र येणाऱ्या महाअघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे दिसून येतेय.  बसपा प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले आहे की, जर व्यवस्थित जागा मिळाल्या तरच आघाडीसाठी तयार आहे. छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकीत कांग्रस-बसपा आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. आशामध्येच मायावती यांनी केलेले हे वक्तव्यावरुन कांग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असेल.  आज माध्यमांशी बोलताना मायावती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच भाजपावर कडाडून टीकास्त्रही सोडले. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील असल्याचा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.

फक्त राहुल गांधीच नव्हे तर विरोधी पक्षांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आणि बसपच्या प्रमुख मायावती हे देखील या शर्यतीत असल्याचा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव यांच्या या दाव्यामुळे कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्या स्वप्नांना मात्र सुरुंग लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 2019च्या निवडणुकीत जर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असा ठराव करण्यात आला होता. काँग्रेसच्या या ठरावावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसmayawatiमायावती