शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

'माया' आटली?... 'टाळी'साठी काँग्रेसला मायावतींनी अट घातली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 20:04 IST

देशातील समस्या सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली केली आहे

नवी दिल्ली :  देशातील समस्या सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली केली आहे. यामध्ये काँग्रेससह अन्य 19 पक्षांचा समावेश आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडीवरून महाआघाडीमध्ये प्रत्येक पक्ष आपला स्वार्थ आणि अस्तित्व दाखवत असल्याचे दिसून येत आहे. महाआघाडीतील एक असेलेल्या मायावती यांनी आपल्याला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच काँग्रेसबरोबर आघाडी करणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता  महाआघाडीत बिघाडीची चिन्हे दिसू लागली आहेत. दुसरीकडे अविश्‍वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांच्या एकीचा फुगा फुटण्याचीच चिन्हे दिसल्याने दुसरीकडे भाजपाच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या असतील.  

मोदी विरोधात एकत्र येणाऱ्या महाअघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचे दिसून येतेय.  बसपा प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले आहे की, जर व्यवस्थित जागा मिळाल्या तरच आघाडीसाठी तयार आहे. छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकीत कांग्रस-बसपा आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. आशामध्येच मायावती यांनी केलेले हे वक्तव्यावरुन कांग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असेल.  आज माध्यमांशी बोलताना मायावती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच भाजपावर कडाडून टीकास्त्रही सोडले. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील असल्याचा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.

फक्त राहुल गांधीच नव्हे तर विरोधी पक्षांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आणि बसपच्या प्रमुख मायावती हे देखील या शर्यतीत असल्याचा दावा राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव यांच्या या दाव्यामुळे कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्या स्वप्नांना मात्र सुरुंग लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 2019च्या निवडणुकीत जर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असा ठराव करण्यात आला होता. काँग्रेसच्या या ठरावावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसmayawatiमायावती