शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

“पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र, देशभर आंदोलन करणार”; मौलाना तौकीर रझा यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 22:59 IST

देश पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे, या रझा यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बरेली: राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी देशभरात झालेल्या हिंसक घटनांनतर आता पुन्हा एकदा जातीय हिंसाचाराबद्दल केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांबाबत पंतप्रधान मोदी गप्प का, अशी विचारणा विरोधी पक्षांनी केली आहे. यातच आता मौलाना तौकीर रझा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र असल्याची टीका केली आहे. 

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मौलाना तौकीर रझा यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बुलडोझर कारवाई आणि लाऊडस्पीकर वादावर बोलताना, ज्या दिवशी देशातील मुस्लिम रस्त्यावर येतील, तेव्हा त्यांना सांभाळणे फार कठीण होईल, अशा इशारा रझा यांनी यावेळी बोलताना दिला. दुसरीकडे, जे मर्यादा पुरुषोत्तम राम मानतात, रामचरित मानस वाचतात, हनुमान मानतात, हनुमान चालीसा पाठ करतात, त्यांना कोणाला रोखण्याचा अधिकार नाही. पण इतरांना त्रास देण्याचे काम कले जात असेल तर ते योग्य नाही, असे रझा म्हणाले.

भारतात महाभारत घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

दिल्लीतील हिंसाचारानंतर तेथे करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईबाबत केलेल्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशात जी परिस्थिती आहे, ती चांगली नाही. आमच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. मुस्लिम रस्त्यावर येतील, तेव्हा परिस्थिती कठीण होऊ शकेल. भारतात महाभारत घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे रझा यांनी म्हटले आहे. तसेच देश पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने जात असल्याचे वक्तव्यही रझा यांनी केले आहे. याशिवाय देशातील वातावरण विचित्र बनले आहे. यंदाच्या वर्षी ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आहे. ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी फुटीरतावादावर विश्वास ठेवणाऱ्यांना आपल्या देशातील वातावरण बिघडवण्याची संधी मिळेल. एकता आणि बंधुतेचा संदेश आम्ही नेहमीच देतो. द्वेष पसरवल्यामुळे लोक संतप्त झाले आहेत, त्यामुळे अशा घटना घडत आहेत, असे रझा म्हणाले. 

दरम्यान, दिल्लीतून जेल भरो आंदोलन सुरू होणार आहे. १० दिवसांनी बैठक होणार असून, त्यानंतर जेल भरो आंदोलनाची तारीख ठरवली जाणार आहे. ज्यामध्ये देशभरातून करोडो लोक पोहोचतील. तौकीर रझा म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी पक्षाचा राजीनामा द्यावा, कारण ते केवळ मुस्लिमांच्या मतांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे. 

टॅग्स :MahabharatमहाभारतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण