शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

“पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र, देशभर आंदोलन करणार”; मौलाना तौकीर रझा यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 22:59 IST

देश पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे, या रझा यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बरेली: राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी देशभरात झालेल्या हिंसक घटनांनतर आता पुन्हा एकदा जातीय हिंसाचाराबद्दल केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांबाबत पंतप्रधान मोदी गप्प का, अशी विचारणा विरोधी पक्षांनी केली आहे. यातच आता मौलाना तौकीर रझा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धृतराष्ट्र असल्याची टीका केली आहे. 

उत्तर प्रदेशमधील बरेली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मौलाना तौकीर रझा यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बुलडोझर कारवाई आणि लाऊडस्पीकर वादावर बोलताना, ज्या दिवशी देशातील मुस्लिम रस्त्यावर येतील, तेव्हा त्यांना सांभाळणे फार कठीण होईल, अशा इशारा रझा यांनी यावेळी बोलताना दिला. दुसरीकडे, जे मर्यादा पुरुषोत्तम राम मानतात, रामचरित मानस वाचतात, हनुमान मानतात, हनुमान चालीसा पाठ करतात, त्यांना कोणाला रोखण्याचा अधिकार नाही. पण इतरांना त्रास देण्याचे काम कले जात असेल तर ते योग्य नाही, असे रझा म्हणाले.

भारतात महाभारत घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

दिल्लीतील हिंसाचारानंतर तेथे करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईबाबत केलेल्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशात जी परिस्थिती आहे, ती चांगली नाही. आमच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. मुस्लिम रस्त्यावर येतील, तेव्हा परिस्थिती कठीण होऊ शकेल. भारतात महाभारत घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे रझा यांनी म्हटले आहे. तसेच देश पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने जात असल्याचे वक्तव्यही रझा यांनी केले आहे. याशिवाय देशातील वातावरण विचित्र बनले आहे. यंदाच्या वर्षी ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आहे. ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी फुटीरतावादावर विश्वास ठेवणाऱ्यांना आपल्या देशातील वातावरण बिघडवण्याची संधी मिळेल. एकता आणि बंधुतेचा संदेश आम्ही नेहमीच देतो. द्वेष पसरवल्यामुळे लोक संतप्त झाले आहेत, त्यामुळे अशा घटना घडत आहेत, असे रझा म्हणाले. 

दरम्यान, दिल्लीतून जेल भरो आंदोलन सुरू होणार आहे. १० दिवसांनी बैठक होणार असून, त्यानंतर जेल भरो आंदोलनाची तारीख ठरवली जाणार आहे. ज्यामध्ये देशभरातून करोडो लोक पोहोचतील. तौकीर रझा म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी पक्षाचा राजीनामा द्यावा, कारण ते केवळ मुस्लिमांच्या मतांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे. 

टॅग्स :MahabharatमहाभारतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण