शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

 मन की बात : योग्य खबरदारी घेतल्यास दुर्घटना टळतीत - मोदी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 13:23 IST

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात च्या 41 व्या भागात विविध मुद्यांवरून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी यंत्रांचा मानव कल्याणासाठी वापर करण्याचे आणि दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन देशवासियांना केली.

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात च्या 41 व्या भागात विविध मुद्यांवरून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी यंत्रांचा मानव कल्याणासाठी वापर करण्याचे आणि दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन देशवासियांना केली. त्याबरोबरच विज्ञान दिवस, जागतिक महिला दिन आणि नॅशनल सेफ्टी डे विषयी चर्चा करतानाच मोदींनी होळीविषयीचे आपले अनुभव देशवासियांना ऐकवले. तसेच देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.  नरेंद्र मोदींनी आजच्या मन की बातची सुरुवात विज्ञान दिवसाच्या आठवणीने केली. यावेळी त्यांनी प्राचीन काळातील बोधायन, भास्कराचार्य आणि आर्यभट यांचा उल्लेख केला. तसेच आधुनिक काळातील भारतरत्न सर सी.व्ही. रमन यांचीही आठवण मोदींनी काढली. सर जगदीशचंद्र बोस,  हरगोविंद खुराणा यंच्यापासून सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे शास्त्रज्ञ भारतवासीयांचे भूषण असल्याचे त्यांनी सांगितले.  मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 मार्च रोजी होणाऱ्या नॅशनल सेफ्टी डे चा उल्लेख केला. सुरक्षेच्याबाबती निष्काळजीपणा न दाखवल्यास जीवन सुरक्षित होऊ शकते. बहुतांश  दुर्घटना  चुकांमुळे होतात. त्यामुळे चुका टाळल्यास अशा दुर्घटना कमी होऊ शकतात, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी एनडीएमएच्या कार्याचेही कौतुक केले. नैसर्गिक आपत्तीशी लढण्यासाठी एनडीएमए कायम सज्ज असते. एनडीएमएकडून नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली जात आहे."असे मोदी म्हणाले. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून रोबोट्स, बोट्स आणि स्पेसिफिक टाक्स करणाऱी यंत्रे बनवण्यास मदत मिळते. आजकाल यंत्रे सेल्फ लर्निंग मधून इंटेलिजेंट आणि स्मार्ट बनत आहेत, त्यामुळे आर्टिफिशन इंटेलिजन्सचा वापर करून दिव्यांगांचे जीवन सुधारण्यासाठी मदत होऊ शकते का याची चाचपणी व्हायला हवी. देशवासियांशी संवाद साधताना स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी वीज पोहोचलेल्या मुंबई जवळील एलिफंटा येथील 3 गावांचाही मोदींनी आवर्जुन उल्लेख केला.  तसेच महिलांनी स्वत:च्या आत्मबळाच्या जोरावर स्वत:ला स्वयंपूर्ण बनवल्याचे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातIndiaभारत