शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर मोठा हल्ला, तीन जवानांना वीरमरण, ६ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 13:24 IST

घटना बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुमारे ९५ किमी दूर असलेल्या चंदेर जिल्ह्यात घडली.

इंफाळ - मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर उग्रवाद्यांनी मोठा हल्ला केला असून, या हल्ल्यात तीन जवानांना वीरमरण आले आहे, तर सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुमारे ९५ किमी दूर असलेल्या चंदेर जिल्ह्यात घडली.

हल्ला झाला तो संपूर्ण भाग पर्वतमय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक उग्रवादी संघटना पिपल्स लिबरेशन आर्मीने हा हल्ला केला. दरम्यान, लष्कराने उग्रवाद्यांविरोधात जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच भारत आणि म्यानमारच्या सीमेवरही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

भारत-म्यानमार सीमेवर असलेल्या उग्रवादी गटांविरोधात शोधमोहीम सुरू असताना हा हल्ला झाला. यामध्ये ४ आसाम रायफल्सच्या तीन जवानांना वीरमरण आले. दरम्यान, या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चंदेल जिल्ह्यातच आसाम रायफल्सच्या तळावर उग्रवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी उग्रवाद्यांनी सैनिकी तळावर बॉम्ब फेकले. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबार झाला होता. मात्र त्या हल्ल्यात लष्कराची कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती.    

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत