शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
3
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
4
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
5
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
6
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
7
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
8
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
9
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
10
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
11
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
12
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
13
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी
14
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
15
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
16
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
17
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
18
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
19
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर मोठा हल्ला, तीन जवानांना वीरमरण, ६ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 13:24 IST

घटना बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुमारे ९५ किमी दूर असलेल्या चंदेर जिल्ह्यात घडली.

इंफाळ - मणिपूरमध्ये लष्कराच्या जवानांवर उग्रवाद्यांनी मोठा हल्ला केला असून, या हल्ल्यात तीन जवानांना वीरमरण आले आहे, तर सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुमारे ९५ किमी दूर असलेल्या चंदेर जिल्ह्यात घडली.

हल्ला झाला तो संपूर्ण भाग पर्वतमय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक उग्रवादी संघटना पिपल्स लिबरेशन आर्मीने हा हल्ला केला. दरम्यान, लष्कराने उग्रवाद्यांविरोधात जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच भारत आणि म्यानमारच्या सीमेवरही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

भारत-म्यानमार सीमेवर असलेल्या उग्रवादी गटांविरोधात शोधमोहीम सुरू असताना हा हल्ला झाला. यामध्ये ४ आसाम रायफल्सच्या तीन जवानांना वीरमरण आले. दरम्यान, या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चंदेल जिल्ह्यातच आसाम रायफल्सच्या तळावर उग्रवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी उग्रवाद्यांनी सैनिकी तळावर बॉम्ब फेकले. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबार झाला होता. मात्र त्या हल्ल्यात लष्कराची कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती.    

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत