शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus News: देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू; आयएमएचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 06:24 IST

परिस्थिती बनली आणखी बिकट'

नवी दिल्ली : देशातील रुग्णांची संख्या १० लाखांवर गेली असून, आता कोरोनाच्या सामूहिक संसर्गालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचा (आयएमए) एक विभाग असलेल्या हॉस्पिटल बोर्ड आॅफ इंडियाचे प्रमुख डॉ. व्ही. के. मोंगा यांनी म्हटले आहे.त्यांनी सांगितले की, सध्या देशात दररोज कोरोनाचे तीस हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होत असून, ते चांगले चिन्ह नाही. देशात सामूहिक संसर्ग सुरू झाला आहे.

डॉ. मोंगा म्हणाले की, शहरांच्या तुलनेत गावांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढत आहे. तिथे कोरोना साथीच्या फैलावावर नियंत्रण मिळविणे अवघड आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवले असले, तरी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेश या राज्यांतील ग्रामीण भागात तसे यश मिळालेले नाही. त्या राज्यांनी तातडीने अधिक प्रभावी उपाय योजावेत. त्यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी. यासाठी प्रतिबंधक लस प्रत्येकाला टोचणे हा एक चांगला उपाय आहे.

लसीच्या परिणामांचा अभ्यास आवश्यक

डॉ. मोंगा म्हणाले की, प्रायोगिक तत्त्वावर बनविलेल्या लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. या लसीमुळे तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकते का, याचाही अभ्यास करावा लागेल. या लसीमुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी निर्माण झालेली प्रतिकारशक्ती तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही, असे दिसून आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत