शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जैशच्या दहशतवादी तळांवरच भारताकडून हल्ले, मसूद अजहरच्या भावाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 04:55 IST

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बालाकोट येथे दहशतवादी तळांवरच हल्ले चढविले होते, अशी कबुली जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा भाऊ मौलाना अम्मार याने एका ध्वनिफितीत दिली आहे.

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बालाकोट येथे दहशतवादी तळांवरच हल्ले चढविले होते, अशी कबुली जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा भाऊ मौलाना अम्मार याने एका ध्वनिफितीत दिली आहे.अम्मारने म्हटले आहे की, जैश-ए-मोहम्मदच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या या तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. भारतीय लढाऊ विमानांच्या हल्ल्यामुळे या तळांचे मोठे नुकसान झाले आहे. अम्मारची ही ध्वनिफीत पाकिस्तानमध्ये बातमीदारी करणाऱ्या एका पत्रकाराने टिष्ट्वटरवर झळकवली आहे. त्या ध्वनिफितीच्या सत्यतेला भारतीय गुप्तचर संस्थांनीही दुजोरा दिला आहे.बालाकोटच्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी ही ध्वनिफीत बनविण्यात आली असावी, असा गुप्तचर संस्थांचा कयास आहे. भारताने केलेल्या हल्ल्याबाबत अम्मारने म्हटले आहे की, शत्रूने इस्लामी देशाविरुद्ध युद्ध पुकारले आहे.सीमा ओलांडून शत्रूने इस्लामी शाळांवर बॉम्बफेक केली. आता शत्रूविरोधात हत्यार उचलण्याची, त्यांच्याविरोधात जिहाद करण्याची वेळ आली आहे. ही ध्वनिफीत पेशावरमधील मदरसा सनान बिन सलमा येथे दहशतवाद्यांना ऐकविण्यात आली.>दहशतवाद्यांना मोठा दणकायासंदर्भात भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाने परिमाणकारक हल्ले चढविले त्याचे पडसादच या ध्वनिफितीच्या रूपाने ऐकू येत आहेत. या हल्ल्यांचा जैश-ए-मोहम्मदला मोठा दणका बसला असून, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडून दहशतवाद्यांना या ध्वनिफितीच्या रूपाने संदेश देण्यात आला आहे.भारताने दहशतवाद्यांवर हल्ले चढविताना पाकिस्तानातील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले नाही. हा हल्लाच इतका जोरदार होता की, त्याचा अपेक्षित तो परिणाम साधला गेला आहे. त्यानंतर पाकिस्तानातील अनेकांची भाषा बदलली आहे.

टॅग्स :masood azharमसूद अजहरterroristदहशतवादी