शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:52 IST

7 फेब्रुवारी 1968 रोजी घडलेल्या विमान अपघात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

सहारनपूर : जगात अनेकदा अशा घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. भारतीय सैन्यातील सैनिकांना हौतात्म्य आल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सियाचीनच्या ग्लेशियरजवळ भारतीय हवाई दलातील जवानाचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जवानाचा मृत्यू 56 वर्षांपूर्वी झालेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सियाचीनमध्ये सापडलेला मृतदेह उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील नानौता भागात राहणाऱ्या हवाई दलाच्या जवानाचा आहे. मलखान सिंग असे या जवानाचे नाव असून, 56 वर्षांपूर्वी विमान अपघातात या जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले होते. आता इतक्या वर्षांनंतर त्या जवानाचा मृतदेह सापडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. गुरुवारी(2 ऑक्टोबर) त्यांचे पार्थिव गावी दाखल झाले आणि कुटुंबीयांनी रीतिरिवाजानुसार त्यावर अंतिम संस्कार केले. आश्चर्याची बाब म्हणजे बर्फात गाडल्या गेल्याने मृतदेह खराब झालेला नव्हता.

मलखान सिंग शहीद झाले, तेव्हा ते अवघ्या 23 वर्षांचे होता. त्यांच्या पश्चात पत्नी शिलादेवी आणि दीड वर्षाचा मुलगा राम प्रसाद होता. मात्र, आता त्यांची पत्नी आणि मुलगा मरण पावल्यामुळे नातवाने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मलखान यांच्या मृत्यूनंतर शिलादेवीने मलखान यांचा धाकटा भाऊ चंद्रपाल यांच्याशी विवाह केला. पण, चंद्रपाल यांचाही मृत्यू झाला आहे. आता कुटुंबामध्ये मलखान यांचे नातू आहेत.

अपघाताच्या दिवशी काय झाले?7 फेब्रुवारी 1968 रोजी एएन-12 विमान चंदीगडहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच बेपत्ता झाले. रोहतांग खिंडीजवळ हवामान खराब झाल्यामुळे विमान क्रॅश झाले होते. यात 100 हून अधिक जवान शहीद झाले होते. हा बर्फाच्छादित पर्वतीय भाग असल्याने मृतदेह बाहेर शोधणे शक्य नव्हते. हे काम इतके अवघड आहे की, 2019 पर्यंत केवळ पाच मृतदेह सापडले. नुकतेच आणखी चार मृतदेह सापडले, त्यापैकी एक मलखान सिंग यांचा आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलHimachal Pradeshहिमाचल प्रदेशAccidentअपघात