शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

'शहीद भगतसिंगचा पुतण्या आंदोलनात सहभागी, त्याला देशद्रोही कधी म्हणणार?'

By महेश गलांडे | Updated: December 26, 2020 17:49 IST

नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत

ठळक मुद्दे दुसरीकडे दिवसेंदिवस आंदोलन ठिकाणी गर्दी वाढत असून शेतकऱ्यांचा आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. 

मुंबई - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाच्या ३० व्या दिवशी शेतकरी पुन्हा आक्रमक होताना दिसत आहेत. सर्वच सीमांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत असून शुक्रवारी यूपी गेटवर आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येत जाट शेतकरी पोहोचले. कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्यातच, शेतकऱ्यांच्या या आंदोलनास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून हुतात्मा भगतसिंह यांचा पुतण्याही या आंदोलनात सहभागी झाला आहे. 

नाताळ आणि लागून शनिवार, रविवार असल्याने सलग तीन दिवसांची सुटी मिळाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील विविध सीमा गाठत आहेत. कायदे मागे घ्यावे म्हणून केंद्र सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याने आंदोलन केव्हाही उग्र रूप धारण करू शकते, अशी शक्यता असल्याने सर्वच सीमांवर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली. आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या सूचना विविध राज्यांतील शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सिंघू सीमेवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर, दुसरीकडे दिवसेंदिवस आंदोलन ठिकाणी गर्दी वाढत असून शेतकऱ्यांचा आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास जगभरातील भारतीय नागरिक पाठिंबा देत आहेत, आज ऑस्ट्रेलियातून क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेल्या नागरिकांना दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. सेलिब्रिटींपासून ते अनेक दिग्गजांकडून या आंदोलनास पाठिंबा देण्यात येत आहे, तसेच मदतही पुरविण्यात येत आहे. विशेष म्हणजे ख्रिसमसदिवशी या आंदोलनात हुतात्मा भगतसिंह यांचा पुतण्याही सहभागी झाल्याची माहिती आहे. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी ट्विट करुन या आंदोलनात हतात्मा भगतसिंह यांचा पुतण्या सहभागी झाल्याची माहिती दिली आहे. तसेच, आता चड्डीवाले त्याला देशद्रोही कधी म्हणणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी आरएसएस आणि भाजपाला लक्ष्य केलंय.  दरम्यान, भाई जगताप यांनी शहीद भगतसिंग यांच्या पुतण्याबद्दल सविस्तर माहिती ट्विटवरुन दिली नाही.  

आधी गोदाम नंतर कायदे -टिकेतमुरादाबाद येथील इकरोटिया टोल प्लाझावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी हे कायदे केवळ उद्योगपतींच्या सेवेसाठी मोदींनी बनविले आहेत. हे उद्योगपती धान्यांची साठेबाजी करण्यासाठी आधी गोदामे उभारतात. त्यानंतर हे कायदे शेतकऱ्यांवर लादले जातात, यातूनच मोदींची नीती स्पष्ट होते, अशी टीका केली.

कायद्याचा एकतरी फायदा सांगा - केजरीवालदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करीत केंद्र सरकारला या कायद्याचे फायदे विचारले. एक तरी फायदा सांगावा असे त्यांनी आवाहन केले. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे निव्वळ नुकसानच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दिल्ली- जयपूर मार्ग जामआंदोलनाच्या समर्थनार्थ हजारो शेतकरी शुक्रवारी दिल्ली- जयपूर मार्गावरील रेवाडी येथे उतरले. राष्ट्रीय महामार्गावर जाम लागला आहे. शेतकऱ्यांना दिल्लीला जायचे आहे; परंतु हरयाणा पोलिसांनी त्यांना अडवले असल्याने शेतकऱ्यांनी जागेवरच धरणे दिलेत. 

टॅग्स :Farmerशेतकरीbhai jagtapअशोक जगतापagitationआंदोलनFarmer strikeशेतकरी संपBhagat Singhभगतसिंग