शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

१५व्या वर्षी लग्न, IAS बनून केली करिअरला सुरूवात, कोण आहेत नवीन कायदा मंत्री अर्जुन मेघवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 19:33 IST

arjun meghwal law minister of india : केंद्रातील भाजप सरकारने नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे.

arjun meghwal | नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमने एक मोठा निर्णय घेत कॅबिनेटमध्ये मोठा बदल केला. मागील काही दिवसांपासून न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किरेन रिजिजू यांचे कायदा मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्याजागी अर्जुन राम मेघवाल यांची मंत्री पदावर वर्णी लागली. IAS बनून आपल्या कारकिर्दीची सुरूवात करणारे मेघवाल आता नवे कायदा मंत्री असणार आहेत.

IAS बनून केली सुरूवातनवे कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची १९८२ मध्ये आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये आपली सेवा बजावली. काही कालावधीनंतर मेघवाल यांना जिल्हा दंडाधिकारी बनवण्यात आले. खरं तर मेघवाल यांनी कायदा आणि मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे (MBA) देखील शिक्षण घेतले आहे. 

दरम्यान, २०१५ मध्ये अर्जुन राम मेघवाल हे लोकसभेत भाजपचे चीफ व्हिप होते. मेघवाल हे सायकलवरून संसदेत जात असत. राजस्थानी पगडी आणि कुर्ता परिधान करून सायकलवरून संसदेत जाणाऱ्या भाजप नेत्याच्या साधेपणाचे खूप कौतुक व्हायचे. मेघवाल २००९ साली राजस्थानच्या बिकानेरमधून निवडून आले. पाच वर्षानंतरही ते पुन्हा एकदा निवडून आले. निवृत्त आयएएस अधिकारी मेघवाल हे पंतप्रधान मोदींचे जवळचे सहकारी मानले जातात. 

वयाच्या १५व्या वर्षी लग्नआपल्या साधेपणामुळे प्रसिद्ध असलेल्या अर्जुन राम मेघवाल यांचा जन्म राजस्थानमधील एका गरीब कुटुंबात झाला. मेघवाल यांनी बिकानेरच्या डुंगर कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. एमबीए व्यतिरिक्त मेघवाल यांनी राज्यशास्त्रात मास्टर्स केले आहे. १९५३ मध्ये जन्मलेल्या मेघवाल यांचे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी लग्न झाले होते. संसदीय कामकाज मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, अर्जुन राम मेघवाल यांचा विवाह पन्ना देवी यांच्याशी १९६८ मध्ये झाला होता.

 

  

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारRajasthanराजस्थान