शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

तेलगू देसमच्या आमदार व माजी आमदाराची हत्या, माओवाद्यांनी कारखाली उतरवून गोळ्या झाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 05:53 IST

दीर्घकाळ शांत राहिलेल्या माओवाद्यांनी (भाकप) रविवारी सत्तारूढ तेलगू देसमचे आमदार किदारी सर्वेश्वर राव (वय ४३ वर्षे) आणि माजी आमदार सावेरी सोमू यांची हत्या करीत खळबळ उडवून दिली आहे.

हैदराबाद - दीर्घकाळ शांत राहिलेल्या माओवाद्यांनी (भाकप) रविवारी सत्तारूढ तेलगू देसमचे आमदार किदारी सर्वेश्वर राव (वय ४३ वर्षे) आणि माजी आमदार सावेरी सोमू यांची हत्या करीत खळबळ उडवून दिली आहे. हे दोघेही आंध्र प्रदेश-ओडिशा सीमेवर ग्राम दर्शनी या सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. सुमारे ५० सशस्त्र नक्षलवाद्यांचा हल्ल्यात सहभाग असल्याचा अंदाज आहे. दरम्यान आंध्र-ओडिशा सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.अराकू (राखीव) मतदारसंघाचे आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि सोमू हे लिप्पिटीपुत्या या गावी पोहोचले असताना माओवाद्यांनी हल्ला केला. सर्वेश्वर राव २०१४ मध्ये वायएसआर काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते, मात्र नंतर तेलगू देसममध्ये प्रवेश केला होता. माओवाद्यांचा एक गट गावकऱ्यांसोबत आला आणि जमावाने राव यांची कार रोखली. राव यांचे खासगी सुरक्षा अधिकारी आणि माजी आमदार सोमू कारबाहेर आले असता त्यांनी एके-४७ रायफलीतून गोळ्या झाडल्या. राव आणि सोमू यांचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी सुरक्षा अधिकाºयांना नि:शस्त्र केले होते. माओवादी आंध्र-ओडिशा सीमा समितीचे सचिव रामकृष्ण यांच्या नेतृत्वात सुमारे ५० ते ६० दहशतवादी हल्ल्यात सहभागी असावेत, असा अंदाज विशाखापट्टणमचे पोलीस उपमहानिरीक्षक सी.श्रीकांत यांनी वर्तवला आहे.मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू न्यूयॉर्कमध्ये असून, त्यांनी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती मागितली आहे. उपमुख्यमंत्री (गृह) एन. चिना राजप्पा आणि पोलीस महानिरीक्षक (प्रभारी) हरीशकुमार गुप्ता यांनी घटनास्थळी भेट दिली.बॉक्साईट खाणींना होता विरोध....माओवाद्यांनी ‘नक्षल हुतात्मा सप्ताह’ आयोजित केल्यामुळे सतर्कता बाळगली असताना ही घटना घडली. आदिवासी पट्ट्यात बॉक्साईट खाणींचे काम पुन्हा सुरू करण्याला नक्षलवाद्यांचा विरोध होता. ग्रेनाईटच्या उत्खननावरून निर्माण झालेल्या वादात आमदार राव यांचा सहभाग होता, अशी माहिती समोर आली आहे.जमावाने दोन पोलीसठाणी जाळली...दरम्यान, आमदार राव यांच्या हत्येच्या निषेधार्थ संतप्त जमावाने अराकू आणि डुमरिगुडा पोलीस ठाण्यांना आग लावली.पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच माओवाद्यांनी हिंसाचार केल्याचा आरोपही राव यांच्या असंख्य समर्थकांनी केला. त्यांच्या शेकडो समर्थकांनी अराकू पोलीसठाण्यात घुसून आग लावल्याने दस्तऐवज जळून खाक झाले. तेथील फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जमावाच्या उग्र रूपामुळे पोलिसांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. डुमरिगुडा पोलीसठाण्याचे जाळपोळीत मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशnewsबातम्या