शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशासमोर अनेक प्रश्न, PM मोदींवर जनतेचा किती विश्वास उरलाय? समोर आली धक्कादायक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:57 IST

Narendra Modi: देशासमोर महागाई, बेरोजगारीसह अनेक प्रश्न उभे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाबाबत जनतेच्या मनात काय भावना आहेत, याबाबत माहिती देणारा एक सर्व्हे समोर आला आहे.

पुढच्या वर्षी देशामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. सलग दोन वेळा जिंकून पंतप्रधानपद भूषवल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन करून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, देशासमोर महागाई, बेरोजगारीसह अनेक प्रश्न उभे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाबाबत जनतेच्या मनात काय भावना आहेत, याबाबत माहिती देणारा एक सर्व्हे समोर आला आहे. फ्युज रिसर्च सेंटरने केलेल्या या सर्व्हेनुसार पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय होण्याची शक्यता आहे.  १० पैकी ८ भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अद्यापही विश्वास आहे. तसेच मागच्या काही वर्षांमध्ये जगात भारताची पत वाढली आहे, असे मत सर्वेत सहभागी झालेल्या लोकांनी मांडले आहे.

भारतामध्ये होत असलेल्या जी-२० संमेलनाच्या एक आठवडापूर्वी हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. एकूण ३० हजार ८६१ जणांशी चर्चा करून हा सर्व्हे २० फेब्रुवारी ते २२ मे २०२३ दरम्यान करण्यात आला आहे. यादरम्यान ६८ टक्के भारतीय प्रौढांनी जगभरात भारताचा प्रभाव वाढला आहे. असं म्हटलं आहे. तर ५५ टक्के लोकांनी मोदींबाबत समाधानकारक मत व्यक्त केलं आहे. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोदीच पुन्हा नेतृत्व करताना दिसावेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

सुमारे १० पैकी ७ भारतीयांनी हल्लीच्या काही वर्षांमध्ये देशाचा जगभरातील प्रभाव वाढल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी तसं नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. ज्या २३ देशांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला त्या देशांमध्ये अमेरिकेबरोबरच कॅनडा, इटली, जर्मनी, यूके, ऑस्ट्रेलिया, जपान आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. येथील २८ टक्के लोकांनी जगात भारताचं महत्त्व वाढल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर २३ देशांपैकी १२ देशातील ३२ टक्के लोकांनी जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी हे योग्य निर्णय घेत असल्याचे सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत