शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

गल्ली ते दिल्ली... बघा, मोदी सरकारने चार वर्षांत किती ठिकाणांची नावं बदलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 18:08 IST

गेल्या चार वर्षांत अनेक शहरं आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहेत. काही नावांमधील बदल विरोधकांना खटकला आणि त्यावरून वादही झाला.

नवी दिल्लीः केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या चार वर्षांत अनेक शहरं आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहेत. काही नावांमधील बदल विरोधकांना खटकला आणि त्यावरून वादही झाला. परंतु, येत्या काळातही ही नामांतराची मालिका सुरूच राहण्याची शक्यता आहे. कारण 27 ठिकाणांची नावं बदलण्याबाबतचे प्रस्ताव केंद्रीय गृहखात्याकडे विविध राज्यांमधून आलेत. त्यात सर्वाधिक प्रस्ताव राजस्थान आणि हरियाणातील आहेत.

या निमित्तानेच एक नजर टाकू या, गेल्या चार वर्षांत नवं नाव मिळालेल्या ठिकाणांवर आणि त्यामागील कारणांवर... 

नोव्हेंबर 2014

कर्नाटकातील 13 शहरांची नावं बदलली, त्यात बेंगलोरचं नाव बदलून बेंगळुरू करण्यात आलं. त्यासोबतच मैसूरचं मैसुरू आणि मेंगलोरचं मेंगळुरू करण्यात आलं. कन्नड भाषेतील शब्दांचं योग्य उच्चारण व्हावं, या उद्देशानं हे बदल करण्यात आले. 

ऑगस्ट 2015

राजधानी दिल्लीतील औरंगजेब रोडला माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं. भाजपाचे खासदार महेश गिरी यांनी याबाबतचा प्रस्ताव दिला होता. 

ऑक्टोबर 2015

राजहमुंद्री हे नाव बदलून राजामहेंद्रवर्मन करण्यात आलं. 11व्या शतकातील राजे राजामहेंद्रवर्मन यांचा सन्मान करण्याच्या हेतूने हा बदल करण्यात आला. 

एप्रिल 2016

गुडगाव झालं गुरुग्राम. गुरू द्रोणाचार्य यांच्या नावावरून हा बदल झाला होता. त्यासोबतच मेवात हे नाव बदलून नूंह करण्यात आलं होतं. 

मे 2016

बेंगळुरू शहर रेल्वे स्टेशनला 19व्या शतकातील स्वातंत्र्यसैनिक क्रांतीवीर संगोल्ली रायन्ना यांचं नाव देण्यात आलं. 

सप्टेंबर 2016

पंतप्रधानांचं निवासस्थान म्हणून भारतीय राजकारणात प्रसिद्ध असलेल्या 7 रेसकोर्सचं नामकरण लोक कल्याण मार्ग करण्यात आलं.

जानेवारी 2017

हरियाणात गांडा नावाचं गाव होतं. त्यावरून तिथल्या ग्रामस्थांची खिल्ली उडवली जायची. ते बदलून अजितनगर करण्यात आलं. 

जुलै 2017

ओडिशातील क्षेपणास्त्र परीक्षण केंद्राचं नामकरण मिसाईल मॅन कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एपीजे अब्दुल कलाम टापू असं करण्यात आलं. 

सप्टेंबर 2017

गुजरातमधील बंदराला जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ यांचं नाव देण्यात आलं. 

फेब्रुवारी 2018 

राजस्थानमधील चोर बसई या गावाच्या नावातून चोर हा शब्द काढून टाकण्यात आला. तर, बिहारमधील नचनिया हे नाव बदलून काशीपूर करण्यात आलं. 

जुलै 2018

मुंबई उपनगरीय रेल्वेवरी एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं नाव प्रभादेवी केलं गेलं. 

जुलै 2018

पश्चिम बंगाल विधानसभेनं राज्याचं नाव बांग्ला असं करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. 

ऑगस्ट 2018

मुगलसराय जंक्शनचं नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असं करण्यात आलं. 1860 मध्ये स्थापन झालेल हे स्टेशन देशातील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक आहे. या नामकरणावरून सत्ताधारी आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. 

दरम्यान, अहमदाबादचं नाव बदलून कामावती करण्याचा प्रस्ताव गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिला आहे. त्याशिवाय, अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आग्रही आहेत.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrabhadeviप्रभादेवीElphinstone Road Stationएल्फिन्स्टन स्थानकAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलाम