शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

लोकसभा निकालानंतर अनेक भाजपा आमदार काँग्रेसमध्ये येणार; काँग्रेस नेत्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 10:00 IST

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास आहे. देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे त्यामुळे 23 मेच्या निकालामध्ये सरकार बदलेलं दिसेल

बंगळुरु - कर्नाटक सुरु असलेल्या सत्तेच्या राजकारणामध्ये काँग्रेस नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीएस येडियुरप्पा यांनी 23 मेनंतर कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होईल असा इशारा दिला होता. त्यावर सोमवारी काँग्रेसचे महासचिव के. सी वेणुगोपाळ यांनी उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक भाजपाचे आमदार काँग्रेसमध्ये सहभागी होतील असा दावा वेणुगोपाळ यांनी केला आहे.

के. सी वेणुगोपाळ यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास आहे. देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे त्यामुळे 23 मेच्या निकालामध्ये सरकार बदलेलं दिसेल असं ते म्हणाले. मग 23 मेनंतर कर्नाटकात सरकार कसं अस्थिर होणार असा प्रश्न वेणुगोपाळ यांनी उपस्थित केला आहे. 

तसेच आम्ही भाजपाच्या आमदारांना काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न करत नाही तर 23 मेच्या निकालानंतर भाजपाचे आमदार स्वत:च्या मर्जीने काँग्रेसमध्ये सहभागी होतील त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही असंही वेणुगोपाळ यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसचे कर्नाटकमधील मंत्री जमीर अहमद खान यांनी येडियुरप्पा यांना सत्तेची दिवास्वप्नं पडत आहेत. भाजपाचे जवळपास 10 आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत असा दावा केला आहे.  

कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यास भाजपाचे सरकार 24 तासांच्या आत सत्तेवर येईल असा दावा केला होता. तसेच काँग्रेस 20 आमदार विद्यमान कर्नाटकच्या सरकारवर नाराज असल्याचंही त्यांनी सांगितले होतं. देशातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत. 

गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात एकूण 28 जागांपैकी भाजपा 17, काँग्रेस 9 आणि जेडीएसने  2  जागांवर विजय मिळवला होता. मात्र, गेल्यावर्षी बेल्लारी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. त्यामुळे सध्या भाजपाकडे 16 जागा आहे. मात्र यंदा कर्नाटकमधील सत्तेवर लोकसभा निवडणुकीचा काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा