शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकसभा निकालानंतर अनेक भाजपा आमदार काँग्रेसमध्ये येणार; काँग्रेस नेत्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 10:00 IST

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास आहे. देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे त्यामुळे 23 मेच्या निकालामध्ये सरकार बदलेलं दिसेल

बंगळुरु - कर्नाटक सुरु असलेल्या सत्तेच्या राजकारणामध्ये काँग्रेस नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीएस येडियुरप्पा यांनी 23 मेनंतर कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होईल असा इशारा दिला होता. त्यावर सोमवारी काँग्रेसचे महासचिव के. सी वेणुगोपाळ यांनी उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक भाजपाचे आमदार काँग्रेसमध्ये सहभागी होतील असा दावा वेणुगोपाळ यांनी केला आहे.

के. सी वेणुगोपाळ यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास आहे. देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे त्यामुळे 23 मेच्या निकालामध्ये सरकार बदलेलं दिसेल असं ते म्हणाले. मग 23 मेनंतर कर्नाटकात सरकार कसं अस्थिर होणार असा प्रश्न वेणुगोपाळ यांनी उपस्थित केला आहे. 

तसेच आम्ही भाजपाच्या आमदारांना काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न करत नाही तर 23 मेच्या निकालानंतर भाजपाचे आमदार स्वत:च्या मर्जीने काँग्रेसमध्ये सहभागी होतील त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही असंही वेणुगोपाळ यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेसचे कर्नाटकमधील मंत्री जमीर अहमद खान यांनी येडियुरप्पा यांना सत्तेची दिवास्वप्नं पडत आहेत. भाजपाचे जवळपास 10 आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत असा दावा केला आहे.  

कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यास भाजपाचे सरकार 24 तासांच्या आत सत्तेवर येईल असा दावा केला होता. तसेच काँग्रेस 20 आमदार विद्यमान कर्नाटकच्या सरकारवर नाराज असल्याचंही त्यांनी सांगितले होतं. देशातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत. 

गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात एकूण 28 जागांपैकी भाजपा 17, काँग्रेस 9 आणि जेडीएसने  2  जागांवर विजय मिळवला होता. मात्र, गेल्यावर्षी बेल्लारी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. त्यामुळे सध्या भाजपाकडे 16 जागा आहे. मात्र यंदा कर्नाटकमधील सत्तेवर लोकसभा निवडणुकीचा काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा