शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

...अन् मन की बातमध्ये मोदींनी दिलं 'त्या' प्रश्नाचं उत्तर, 'ही' गोष्ट न शिकल्याची व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 14:31 IST

Mann Ki Baat And Narendra Modi : नरेंद्र मोदींनी रविवार (28 फेब्रुवारी) मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवार (28 फेब्रुवारी) मन की बात कार्यक्रमातून (Mann Ki Baat) देशवासियांशी संवाद साधला आहे. कला, संस्कृती, पर्यटन आणि शेतीविषयक गोष्टींबाबतची काही प्रेरणादायी उदाहरण देत त्यांनी संवाद साधला. याच दरम्यान मोदींनी एक खंत व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे. जगातील सर्वात जुनी भाषा तमिळ न शिकण्याचं दुःख आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 

मन की बातमध्ये बोलताना मोदी यांनी काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णा रेड्डी यांनी प्रश्न विचारला होता. रेड्डी यांनी मोदींना इतक्या वर्षांपासून तुम्ही पंतप्रधान आहात, त्याआधी अनेक वर्ष मुख्यमंत्री होता. तुम्हाला असं कधी वाटतं का, की स्वतःमध्ये काही कमी राहिली आहे. यावर पंतप्रधान यांनी अपर्णा यांच्या प्रश्नाचं उत्तर सोपं आणि अवघड दोन्ही होतं. ते म्हणाले, की "कधी कधी खूप सोपे प्रश्नही आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. हे प्रश्न सोपे असतात मात्र मनापर्यंत पोहोचतात."

पंतप्रधानांनी अपर्णा यांच्या प्रश्नाने त्यांना काही वेळ विचार करण्यास भाग पाडलं असल्याचं म्हटलं आहे. तसेच मोदी यांनी "मी या प्रश्नाचा विचार केला आणि स्वतःलाच म्हटलं, की माझ्यातील एक कमी ही आहे की मी जगातील सर्वात प्राचीन भाषा तमिळ शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करू शकलो नाही. ही एक अशी सुंदर भाषा आहे, जी जगभरात लोकप्रिय आहे. अनेकांनी मला तमिळ साहित्याचं वेगळपण आणि यातील कवितांची सखोलता यांच्याबद्दल सांगितलं आहे" असं म्हटलं आहे. 

"काँग्रेस खोट्याच्या आधारावर चालते, लोकांची स्वप्न भंग केली अन् त्यांना धोका दिला", पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुद्दुचेरीमध्ये जनतेला संबोधित केलं आहे. या सभेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. काँग्रेस खोट्याच्या आधारावर चालते असा घणाघात मोदींनी केला आहे. "पुद्दुचेरीमधील हवा आता बदलत आहे. हे या सभेतून दिसून आलं आहे. गेल्या निवडणुकीत येथील लोकांनी काँग्रेसला मत दिलं. मात्र काँग्रेसने लोकांना धोका दिला आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय करू या केलेल्या विधानावरही पलटवार केला आहे. मोदी यांनी "काँग्रेसने लोकांची स्वप्न भंग केली आहेत. येथे जे सरकार होतं ते लोकांचं नाही तर काँग्रेसच्या हायकमांडची सेवा करत होतं. येथील माजी मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांडची चप्पल घेऊन जात असत, मात्र येथील लोकांना गरिबीतून वर काढू शकत नव्हते. काँग्रेसच्या सरकारने लोकांसाठी काम केलं नाही तसेच काँग्रेसने इतरांनाही लोकांसाठी काम करण्याची परवानगी दिली नाही. राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात येथे केंद्र योजना राबवण्यास परवानगी दिली नाही" असं म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतMan ki Baatमन की बात