शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आठवडा आधीच केली 'मन की बात'! जाणून घ्या त्यामागचं कारण अन् ४ प्रमुख मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 12:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या वर्षातील 'मन की बात' कार्यक्रमातील ४ प्रमुख मुद्दे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकप्रिय 'मन की बात' या रिडिओवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या विषयावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओवरून प्रसारित केला जातो. पण यावेळी नव्या वर्षातील 'मन की बात'  कार्यक्रमाचा ११८ वा एपिसोड हा एक आठवडा आधीच प्रसारित झाला. यामागचं कारणही  एपिसोड एवढंच खास आहे. जाणून घेऊयात त्यामागचं कारण अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या वर्षातील 'मन की बात' कार्यक्रमातील ४ प्रमुख मुद्दे  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

...म्हणून नव्या वर्षातील पहिला एपिसोड शेवटच्या रविवार ऐवजी आधी प्रसारित झाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमाचा ११८ वा भाग हा जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी प्रसारित झाला. एरव्ही पंतप्रधान मोदी महिन्याच्या अखेरच्या रविवारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. पण या महिन्यात रविवारी प्रजासत्ताक दिन आहे. याच खास कारणामुळेच मोदींनी यावेळी एक आठवडा आधीच 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासिंयाशी संवाद साधला.  

मी संविधान सेभेतील सर्व महापुरुषांना वंदन करतो...

'मन की बात' कार्यक्रमात मोदींनी वेगवेगळ्या विषयावर भाष्य केले. यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. देशात संविधान लागू होऊन ७५ वर्षे होत आहेत. त्यामुळे ७५ वा प्रजासत्ताक दिन खास ठरतो. या निमित्तानं संविधान सेभेतील  सर्व महापुरुषांना मी वंदन करतो. ज्यांनी देशाला पवित्र संविधान दिले, असे मोदींनी म्हटले आहे. 

PM मोदींनी निवडणूक आयोगाचेही मानले आभार

पीएम मोदी यांनी यावेळीच्या कार्यक्रमात निवडणूक आयोगाचेही आभार मानले. ते म्हणाले की, "२५ जानेवारीला नॅशनल वोटर्स डे (National Voters' Day) आहे. याच दिवशी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. संविधान निर्माणकर्त्यांनी लोकशाहीच्या दृष्टीने देशाच्या संविधानात निवडणुक आयोगाला मोठं स्थान दिले आहे. निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मतदान प्रक्रियेत बदल करून ही प्रणाली अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो, असे ते म्हणाले. 

महाकुंभमेळ्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

'मन की बात' कार्यक्रमात मोदींनी महाकुंभमेळ्यावरही भाष्य केले. "प्रयागराज येथून महाकुंभमेळ्याचा श्री गणेशा झाला आहे. मोठ्या संख्येन लोक यात सहभागी झाले आहेत. कल्पनेपलिकडचे दृश्य समता-समरसता याचे अद्भूत संगम दर्शविणारे आहे. यावेळी कुंभमेळ्यात अनेक दिव्य योगायोगही जुळून येत आहेत. हजारो वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा भारतीय लोकांना भारतीय परंपरेशी जोडते"

सॅटेलाइट्समधील भरारीवरही केलं भाष्य

बंगळुरूच्या Startup Pixxel नं भारताचा पहिला Private Satellite तयार करून इतिहास रचला. तंत्रज्ञान क्षेत्रातील या या ऐतिहासिक क्षणाचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात केला. हा क्षण देशासाठी अभिमानास्पद होता. हे Satellite constellation  जगातील सर्वात High-Resolution Hyper Spectral Satellite Constellation आहे, असे सांगत मोदींनी सॅटेलाइट्समधील भरारीवर भाष्य केले. 

 

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीKumbh Melaकुंभ मेळाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग