शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले; सांगितलं, कसं होतंय भारताचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 15:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवर मोठे भाष्य केले आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमाने जनतेशी संवाद साधला. 'मन की बात' कार्यक्रमाचा आजचा 107वा अॅपिसोड होता. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'मन की बात' कार्यक्रम ब्रॉडकास्ट होतो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांवरही भाष्य केले. "आपण विचार करा की, सध्या काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाह करण्याचे जे एक वातावरण तयार होत आहे, हे आवश्यक आहे का?" असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

भारतीय उत्पादनांप्रति असलेली आपली भावना सण, उत्सवांपूरतीच मर्यादीत नसावी -पंतप्रधान मोदी म्हणाले, भारतीय उत्पादनांप्रति असलेली आपली भावना केवळ सण आणि उत्सवांपूरतीच मर्यादीत नसावी, तर आता लग्नसराईचा काळही सुरू झाला आहे. काही व्यापरी संघटनांच्या मते या लग्नसराईच्या काळात जवळपास 5 लाख कोटी रुपयांचा व्यापार होऊ शकतो. लग्नाशी संबंधित खरेदीमध्येही आपण सर्वांनी भारतात तयार झालेल्या उत्पादनांनाच प्राधान्य द्यायला हवे. आणि हो, लग्नाचाच विषय निघाला आहे, तर एक गोष्ट मला बऱ्याच दिवसांपासून कधी-कधी  त्रास देते आणि माझ्या मनातील गोष्ट, मी माझ्या कुटुंबासोबत बोलणार नाही, तर कुणाशी बोलणार?

देशाबाहेर जाऊन लग्न करणे आवश्यक आहे का? -"आपण विचार करा की, सध्या काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाह करण्याचे जे एक वातावरण तयार होत आहे, हे आवश्यक आहे का? भारताच्या मातीत आणि भारतीय लोकांमध्ये आपण लग्न केले, तर देशातील पैसा देशातच राहील. देशातील लोकांना आपल्या लग्न समारंभात काही तरी करायची संधी मिळेल. छोटे-छोटे गरीब लोकही त्यांच्या मुलांना आपल्या लग्नातील गोष्टी सांगतील," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भाष्य करत, या हल्ल्यातील मृतांना आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याच बरोबर, संविधान दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छाही दिल्या. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmarriageलग्नMan ki Baatमन की बात