शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

...तर 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, यूपीत मनीष सिसोदियांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 15:38 IST

manish sisodia : आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यास राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी कोणतेही वीज शुल्क भरावे लागणार नाही, असेही मनीष सिसोदिया म्हणाले.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. मनीष सिसोदिया उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जर उत्तर प्रदेशच्या लोकांनी आम आदमी पार्टीला (आप) मतदान केले तर आप सरकारकडून स्थापनेच्या 24 तासांच्या आत घरगुती वीज मोफत दिली जाईल, ज्याप्रमाणे दिल्लीतील केजरीवाल सरकारने केले आहे, असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले. (manish sisodia promises free electricity to uttar pradesh if aap comes to power)

घरगुती वापरासाठी 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करताना मनीष सिसोदिया म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारच्या कार्यकाळात लोक महागड्या वीज बिलांमुळे त्रस्त आहेत आणि विशेषतः शेतकरी खुश नाहीत, त्यांना महाग वीज मिळत आहे. त्यामुळे तुमचे मत ही समस्या सोडवू शकते. तुम्ही आम्हाला मत दिल्यास ही समस्या सुटेल.

आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यास राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी कोणतेही वीज शुल्क भरावे लागणार नाही, असेही मनीष सिसोदिया म्हणाले. तसेच, कितीही विजेची गरज असली तरी शेतकऱ्यांचे वीज बिल शून्यावर येईल. उत्तर प्रदेशात ५ ते १० हजार कमवणाऱ्या लोकांची बिल लाखोंच्या घरात येत आहे. त्यामुळे लोक आत्महत्या करत आहेत, असे शेकडो लोक आहेत,  ज्यांना अशाप्रकारे त्रास होत आहे, अले मनीष सिसोदिया यांनी सांगितले.

याचबरोबर, एक व्हिडिओ जारी करताना मनीष सिसोदिया यांनी आपले संपूर्ण म्हणणे मांडले. उत्तर प्रदेशातील अनेक प्रकरणांचा हवाला देत, वीज बिलांमुळे लोक कसे आत्महत्या करत आहेत, ते सांगितले. तसेच, केवळ वीज बिलांची समस्याच नाही तर दिल्लीतील वीज कपातीची समस्याही दूर झाली आहे. उत्तर प्रदेशातही केजरीवाल सरकारचा हाच पराक्रम आम आदमी पार्टी करून दाखवेल, असे मनीष सिसोदिया म्हणाले.

केजरीवाल तिसऱ्यांदा ‘आप’चे राष्ट्रीय संयोजकगेल्या शनिवारी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ३४ सदस्यांनी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय संयोजकपदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली. पंकज गुप्ता आणि एन. डी. गुप्ता यांची अनुक्रमे  सचिव आणि  कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पाच वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAAPआपPoliticsराजकारण