शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विवस्त्र धिंड निघाली, तेव्हा पोलिस काय करत होते? सुप्रीम कोर्टानं मणिपूर पोलिसांना धरलं धारेवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 07:02 IST

या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियात  व्हायरल होताच देशात संतापाची लाट उसळली होती.

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याची भयंकर घटना घडत असताना राज्यातील पोलिस काय करत होते? या प्रकरणात नोंदला गेलेला एफआयआर न्यायदंडाधिकाऱ्यांकडे विलंबाने का हस्तांतरित केला असे प्रश्न विचारून सुप्रीम कोर्टाने मणिपूर पोलिसांना धारेवर धरले. धिंड प्रकरणाचा तपास पोलिसांकडे असू नये असे आम्हाला वाटते असेही न्यायालयाने म्हटले आहे.या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियात  व्हायरल होताच देशात संतापाची लाट उसळली होती. त्याबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले की, मणिपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही माजी न्यायाधीशांचा समावेश असलेली एसआयटी किंवा समिती स्थापन करण्याचीही शक्यता आहे. मणिपूरच्या हिंसाचाराबाबत दाखल झालेल्या याचिकांची पुढील सुनावणी उद्या, मंगळवारी होणार आहे.

किती जणांना अटक केली?-  सर्वोच्च  न्यायालयाने सांगितले की, मणिपूरच्या हिंसाचारात ज्यांनी अनेक गोष्टी गमावल्या त्यांचे सांत्वन करण्याची व त्यांना आधार देण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचारांचा बीमोड करण्यासाठी राज्य सरकारने काय धोरण आखले आहे? -  या राज्यातील हिंसाचाराबाबत किती जणांना अटक केली? असे सवालही न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला विचारले. हिंसाचारग्रस्तांना दिलेल्या मदतीचे स्वरूप काय आहे याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

...यही सच है!'इंडिया' आघाडीचे खासदार दोन दिवसांच्या मणिभूर भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी मोरियांग येथील नागरिकांशी चर्चा केली. संसद सदस्याकडून तुम्हाला काही हवे आहे का, असे विचारले असता एका महिलेने घराबाहेरील चूल दाखवत इतकेच उत्तर दिले की, यही सच है!

कोर्टाने म्हटले की, ४ मे रोजी महिलांची विवस्त्र धिंड काढली. नंतर १४ दिवसांनी एफआयआर नोंदविला. हा २४ जूनला न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केला. याला पोलिसांनी विलंब का लावला, असा सवाल कोर्टाने विचारला आहे. पोलिसांनीच महिलांना दंगेखोरांच्या हाती सोपविले, असे काही बातम्यांत म्हटले आहे. त्याचा उल्लेखही न्यायालयाने आवर्जून केला.

किती झीरो एफआयआर दाखल झाले?-  हिंसाचाराबाबत मणिपूरमध्ये किती झिरो एफआयआर दाखल झाले याची आम्हाला माहिती द्यावी असा आदेश सुप्रीम कोर्टाने न्यायालयाने मणिपूर सरकारला सोमवारच्या सुनावणीवेळी दिला आहे. -  एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत न घडलेल्या गुन्ह्याबद्दलदेखील त्या पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करता येतो. त्याला झिरो एफआयआर म्हणतात. -  मणिपूर हिंसाचारातील सहा हजार प्रकरणांबाबत पोलिसांनी काय कारवाई केली याचाही तपशील सर्वोच्च न्यायालयाने मागविला आहे. 

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयPoliceपोलिस